विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने धमाकेदार कामगिरी केली आहे. कर्नाटकविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये शॉने 122 बॉलमध्ये 165 रन केले. यात 17 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. याशिवाय पृथ्वी शॉ या मोसमात 750 पेक्षा जास्त रन करणारा पहिला खेळाडू बनला आहे.
कर्णधार म्हणून शॉने लागोपाठ तिसऱ्या मॅचमध्ये 150 पेक्षा जास्त रनची खेळी केली आहे. पृथ्वीने पुदुच्चेरीविरुद्ध ग्रुप स्टेजमध्ये नाबाद 227 रनची खेळी केली होती. स्पर्धेच्या इतिहासातला हा सर्वाधिक स्कोअर होता. तर मंगळवारी त्याने आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय खेळाडूचा लिस्ट ए मधला सर्वाधिक स्कोअर केला. सौराष्ट्रविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये पृथ्वी शॉ याने नाबाद 185 रन केले. याचसोबत त्याने धोनी आणि विराटलाही मागे टाकलं.