ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय टीमने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात इतिहास घडवला. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारताने 2-1 ने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर भारताचा हा लागोपाठ दुसरा सीरिज विजय होता. हा दौरा संपल्यानंतर अजिंक्य रहाणे मुंबईमध्ये त्याच्या घरी परतला.