

६ डिसेंबरपासून सुरू होणार ऑस्ट्रेलियाविरुद्धची ४ सामन्यांची कसोटी मालिका विराटसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. या मालिकेवरच त्याचा कर्णधारपदाचा आणि टीम इंडियाची शान अवलंबून आहे. यासोबतच ही कसोटी मालिका टीम इंडिया कसोटीच्या क्रमवारीत अग्रणी राहणार की नाही हेही ठरवणार आहे.


आयसीसीच्या टेस्ट रँकिंगनुसार, भारतीय संघ यावेळी ११६ अंकांनी पहिल्या स्थानावर आहे. तर १०८ अंकांनी इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका १०६ अंकांनी तिसऱ्या, न्युझीलँड १०२ अंकांनी चौथ्या आणि १०२ अंकांनी ऑस्ट्रेलिया संघ पाचव्या स्थानावर आहे.


ही मालिका भारत हरला तर भारत टेस्ट रँकिंगमध्ये सरळ तिसऱ्या स्थानावर कसा फेकला जाईल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत ही मालिका ०-४ ने हरली आणि दक्षिण आफ्रिकाने २६डिसेंबरपासून त्यांच्या मायदेशात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला ३-० ने हरवले तर भारताची कसोटी रँकिंगमध्ये घसरण होईल.


या परिस्थिती दक्षिण आफ्रिका नंबर १ चा कसोटी संघ होईल. तर भारताला ४-० ने हरवल्यानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर जाईल. तर इंग्लंडची तिसऱ्या स्थानावर घसरण होईल. तर भारत इंग्लंडहून खाली येत चौथ्या स्थानावर येईल.


ऑस्ट्रेलियाचा संघ कमकूवत जरी असला तरी भारताने परदेशात कधीच फार चांगलं प्रदर्शन केलेलं नाही. यासाठी जुना इतिहास साक्ष आहेच.