वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा मानला जातो. घराच्या मुख्य दाराशी काही गोष्टी असाव्या, ज्यामुळे घरातील आर्थिक समस्या संपुष्टात येतात आणि कुटुंबातील सदस्यांची व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती होते. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.
तुळशीचे रोप - तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानले जाते, तुळशीचे रोप जवळपास प्रत्येक हिंदू घरात लावलेले आढळते. मान्यतेनुसार, तुळशी भगवान विष्णूलाही खूप प्रिय आहे. तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. घराच्या मुख्य दरवाजासमोर तुळशीचे रोप लावल्यास घराची आर्थिक स्थिती चांगली राहते, असे वास्तुशास्त्रातही मानले जाते.
स्वस्तिक चिन्ह - घरामध्ये वास्तुदोष असेल तर घराची आर्थिक स्थिती चांगली राहू शकत नाही. अशा स्थितीत घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी उपाय करणे अत्यंत आवश्यक ठरते. यासाठी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिकचे चिन्ह लावणे सर्वात महत्त्वाचे आहे. घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.
गणपतीची मूर्ती - घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आणि घरातील सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दारावर गणपतीचा फोटो/मूर्ती लावू शकता, परंतु श्रीगणेशाची मूर्ती नेहमी अशा प्रकारे ठेवावी की त्याची पाठ बाहेर असावी. श्रीगणेशाचे मुख आतल्या बाजूला केल्याने कुटुंबातील अडथळे नष्ट होतात आणि घरातील सदस्यांना प्रत्येक कामात यश मिळते.
सूर्य यंत्र - घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होण्यासाठी सूर्याची किरणे सर्वात महत्त्वाची असतात, तुमचे घर नेहमी अशा प्रकारे बनवले पाहिजे की जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आत येईल, परंतु जर तुमच्या घरात जास्त सूर्यप्रकाश येत नसेल तर तुम्ही सूर्याची प्रतिष्ठापना करू शकता. तुमच्या घराच्या मुख्य दारावर सूर्य यंत्र लावावे. असे मानले जाते की यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.