Chanakya Niti: अशा लोकांसमोर तोंड उघडताना 10 वेळा करा विचार; तुमच्या सिक्रेट होतील जगजाहीर
आचार्य चाणक्य यांच्या मते, माणसाचे योग्य निर्णय त्या व्यक्तीला यशाच्या उंचीवर नेऊन ठेवतात. मात्र, चुकीच्या निर्णयांमुळे केवळ बरबादीच हातात पडते. त्यामुळे माणसाने योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखायला शिकलं पाहिजे. बरेचसे लोक चांगल्या माणसांना ओळखण्यात चूक करतात आणि चुकीच्या माणसावर विश्वास ठेवून नुकसान करतात.
आचार्य चाणक्य सांगतात, ज्या नद्यांवरचे पूल पक्के नाहीत. त्या नद्यांवर कधीच विश्वास ठेवू नका. नदीचा प्रवाह वाढून कधीही पूल वाहून जाऊ शकतो. म्हणजेच जे लोक आपल्या सोबत विश्वासाने राहण्याची खात्री नसते अशा लोकांवर कधीच भरोसा ठेवू नये.
2/ 5
जी माणसं स्वतःबरोबर शस्त्रास्त्र बाळगतात त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. कारण रागाच्या भरात ते तुमच्यावर हल्ला करू शकतात. याचा अर्थ ज्या लोकांचा आपल्या रागावर ताबा नसतो अशा लोकांची संगत कधीच करू नये.
3/ 5
नीति शास्त्रानुसार ज्या स्त्रीचा स्वभाव चंचल आहे. तिच्यावर भरोसा करू नका कारण, अशा स्त्रिया आपल्याला अडचणीमध्ये टाकण्याची शक्यता असते.
4/ 5
ज्या माणसांचे संबंध वरिष्ठ माणसांशी असतात अशाही लोकांवर कधीच विश्वास ठेवू नये. कारण, तुमच्या मनातल्या गोष्टी जाणून ते आपल्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवू शकतात. यामुळे तुमच्याच शब्दांमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.
5/ 5
संयम स्वभाव नसेलेली माणसं नेहमी धोकादायक असतात. ज्या लोकांमध्ये संयम नसतो, अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. संयम नसणारी माणसं रागाच्याभरात तुमचंही नुकसान करतील आणि स्वतःचंही नुकसान करतील.