"अनेक लोक शिवाजी महाराजांचे आपण उत्तराधिकारी आहोत असं सांगतात मात्र असे सांगताना त्यांनी घाबरू नये, मात्र शिवाजी महाराजांचे नाव घेऊन नुसता दिखावा देखील करू नये" असं म्हणत शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना राज्यपालांनी अप्रत्यक्षपणे फटकारले. "शिवाजी महाराज हे अवतारी पुरुष होते येथे आल्यानंतर त्यांच्या कर्तव्याची आठवण होते आज राम, कृष्ण,गुरुगोविंदसिंग, शिवाजी महाराज हे पुन्हा जन्माला आले पाहिजेत, तरच जग आपल्याकडे तिरक्या नजरेने पाहणार नाही" अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
आपण उतारवयात देखील किल्ले शिवनेरी पायी चढून आलो.राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील शिवनेरीवर पायी चालत यावं असे तुम्हाला वाटते का? या News 18 लोकमतच्या प्रश्नावर उत्तर देताना राज्यपाल म्हणाले की, " हा, ज्याच्या-त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. माझी शिवाजी महाराजांप्रती असलेल्या श्रद्धेपोटी मी पायी आलो" असं त्यांनी सांगितलं.