

जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की त्या शाळेकड एका वेगळ्याच नजरेने पाहिलं जातं. जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे जेथे अपुऱ्या सुविधा असा सर्वसाधारण समज आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या कणेरीवाडी या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेने हा चुकीचा समज दूर केला आहे.


विशेष म्हणजे आजी-माजी विद्यार्थ्यांनी शाळेचा विकास व्हावा यासाठी निधी जमा केला व तब्बल 29 लाख रुपयांतून शाळा डिजिटल करण्यात आली. या शाळेसाठी केवळ 6 लाखांचा सरकारी मदत मिळाल्याचे येथील शिक्षकांनी सांगितलं.


तब्बल 29 लाख रुपये खर्च करून कणेरीवाडी गावात शाळा डिजिटल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण राज्यात डिजिटल ठरलेली ही पहिलीच शाळा असणार आहे.


शनिवारी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते या नव्या शाळेचे उद्घाटन केलं जाणार आहे. त्यादृष्टीने शाळेत तयारी करण्यात आली आहे. शाळेच्या पटांगणात मंडप टाकण्यात आला असून सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे.


या शाळेत आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सर्वाधिक पटसंख्या अशी ओळख आहे. कोरोना काळात या शाळेत खूप नुकसान झालं होतं, मात्र नवीन वर्षात शाळेचं रुप पालटलं आहे. तंत्रज्ञानाने युक्ती अशी शाळा पाहून विद्यार्थी आवर्जून शाळेत येत आहेत


या शाळेत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी कम्युटर लॅब आहे. जेथे विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधांचा समावेश आहे. तर दुसरीकडे वर्गात टीव्ही देखील ठेवण्यात आला आहे.