

अभिनेता सुशांत सिंह राजपूतप्रमाणेच (sushant singh rajput) कन्नड अभिनेत्री (Kannada Actress) आणि बिग बॉस-3 ची (Bigg Boss 3) स्पर्धक जयश्री रामय्याने (Jayashree Ramaiah) आपलं आयुष्य संपवलं आहे.


जयश्री रामय्या हिने गेल्या वर्षी जूनमध्येच सोशल मीडियावर आपण आत्महत्या करणार असल्याचं लिहिलं होतं. GOOD BYE TO THE WORLD अशी पोस्ट तिनं केली होती.


जयश्रीने फेसबुकवर ही पोस्ट करताच त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. सोशल मीडियावर सातत्याने येणाऱ्या प्रतिक्रियेनंतर जयश्रीने आपली ती पोस्ट डिलीट केली आणि नवी पोस्ट करून आपण सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं. जयश्रीला काहीही झालेलं नाही हे समजताच सर्वांना हायसं वाटलं. सर्वांनी तिला असं पाऊल उचलू नको असा सल्ला दिला होता.


जयश्री डिप्रेशनमध्ये होती. कानडी सुपरस्टारने तिला काम मिळवून देऊन मदत करण्याचंही सांगितलं आणि त्या वेळी टोकाच्या नैराश्यातून ती कशीबशी बाहेर पडली. जयश्रीवर मानसोपचार सुरू होते. पण ती नैराश्यातून पूर्ण बाहेर येऊ शकली नाही.


कन्नड Bigg Boss च्या तिसऱ्या सीझनमध्ये जयश्री रामय्या सहभागी झाली होती. तिच्याबरोबरच्या अनेक स्पर्धकांना या रिअॅलिटी शोनंतर कुठे ना कुठे काम मिळालं. पण जयश्री त्या बाबतीत खूश नव्हती. तिला अभिनयाच्या क्षेत्रात योग्य संधी मिळाली नाही आणि त्यातूनच तिला नैराश्य आलं. त्याबद्दल तिने तिच्या मित्रमंडळींंना सांगितलं होतं.


कन्नड स्टार किचा सुदीप बंगळुरूच्या संध्या किराना आश्रमात जयश्री रामय्यावर उपचार सुरू होते. पण ती या आजारातून अखेरपर्यंत बाहेर येऊ शकली नाही.


सोमवारी ती कुणाचाही फोन उचलत नसल्याचं, मेसेजला उत्तर देत नसल्याचं तिच्या नातेवाईक आणि मित्रांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने ती ज्या आश्रमात उपचार घेत होती, त्यांच्याशी संपर्क साधला.