

लोकसभा निवडणूकीच्या अगोदर रेल्वेत मेगा भरती करण्यात येणार असल्याची घोषणा पीयूष गोयल यांनी केली आहे. त्यांनी बुधवारी सांगितले की रेल्वेमध्ये जवळपास ४ लाख नोकऱ्या देण्यात येणार आहे. त्यापैकी २ लाख ३० हजार लोकांची भरती करण्यात येणार आहे.


रेल्वेची ही मेगाभरती दोन टप्प्यांत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १ लाख ३१ हजार लोकांची भरती केली जाणार आहेत. फेब्रुवारी २०१९ ते मे २०२० पर्यंत या जागा भरण्यात येणार आहेत.


दुसऱ्या टप्प्यात एक लाख लोकांची भरती करण्यात येणार आहे. २०२० ते जुलै २०२१ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे


दोन्ही टप्प्यात मिळून २ लाख ३० हजार लोकांची भरती करण्यात येणार आहे. यापैकी ३४ हजार अनुसूचित जासी, १७ हजार अनुसूचित जमाती, ६२ हजार ओबीसींची भरती होईल.


अर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना मेगाभरतीमध्ये १० टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे २३ हजार सवर्णांना आरक्षणाचा फायदा होणार आहे.


रोजगाराच्या मुद्द्यावरून सरकार विरोधी पक्षाच्या टीकेचा धनी होत आहे. काही दिवसांपूर्वी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना रेल्वेने सांगितले होते की, २००८ ते २०१८ या काळात जितके लोक निवृत्त होतील त्यापेक्षा कमी लोकांनाच रोजगार देण्यात आला. त्यामुळे रेल्वेत ३ लाख पदे रिक्त आहेत.