मॉरिशसमध्ये 7 ऑगस्ट रोजी पर्यावरणीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. मॉरिशसच्या समुद्रातील एका भागात तेलगळती झाल्यानंतर मदतीचं आवाहन केल्यानंतर भारत पुढे आला आहे. भारत सरकारने वायुसेना हेलिकॉप्टर IAF C-17 च्या माध्यमातून 30 टन टेक्निकल उपकरण आणि साहित्य पाठविलं आहे. तेलगळतीच्या संकटात मदत म्हणून भारत पुढे आला आहे.
जपानी अधिकाऱ्यांनी शनिवार सांगितले की गेल्या महिन्यात जे मालवाहक जपानी जहाज 'एमवी वाकाशियो' (MV Wakashio) मॉरिशसमध्ये एका खडकाला धडक दिल्याने अडकले होते ते दोन भागांमध्ये तुटले असून त्याने दोन वेगळे (Japanese Ship Broken) भाग झाले आहेत. मॉरिशस नॅशनल क्राइसिस कमिटी (Mauritius National Crises Committe) ने सांगितले की शनिवारी जहाजची परिस्थिती खूप खराब झाली होती आणि दुपार होत असताना त्याचे दोन तुकडे झाले. कमिटीने हे देखील सांगितले की जहाजाच्या पुढील भाग सायंकाळी 4.30 वाजता वेगळा झाला होता. विशेष तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आता याला खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.