

आधुनिक भारत, डिजीटल इंडिया सारख्या घोषणा सरकार करत असताना हे फोटो प्रत्येकाला हादरून सोडणारे आहेत. हरियाणामधील या गावातील फोटो भयंकर परिस्थितीची जाणीव करू देतात. हे फोटो पाहून तुम्ही विचार करण्यात प्रकृत्त व्हाल. (PHOTO: News18)


हरियाणातील भिवानी गावाचे हे फोटो तलावाचे किंवा शेतात पाणी भरल्याचे नाही आहे. लोकं नदी-नालेही पार करत नाही आहेत. तर हे फोटो आहेत बावणीखेला शहरालगतच्या प्रेमनगर या गावच्या स्मशानभूमीच्या मार्गावरचे. बर्याच दिवसांपासून पाण्याने भरलेल्या या गावातून जाण्यासाठी लोकांना घाण पाण्यात जावे लागले. (PHOTO: News18)


एवढेच नाही तर इच्छा असूनही आपल्या प्रियजनांच्या मृतदेहाला खांदाही देता येत नाही. स्मशानभूमीजवळ जाण्याचा रस्ता इतर खराब आहे की, एक व्यक्तीही इथून जाऊ शकत नाही. हे फोटो आहेत, या गावातील 62 वर्षीय हवा सिंग यांचे निधन झाल्यानंतर त्यांना ट्रॅक्टरमधून स्मशानभूमीत घेऊ जाण्यात आले. (PHOTO: News18)


आधुनिक भारतात पहिल्या क्रमांकावर असलेल्या हरियाणाचे हे फोटो पाहून खेड्यातील यंत्रणा आणि समाजाविरुद्ध तुम्ही आवाज उठवाल. मात्र यथील सरपंचांनी लोकांवरही रस्ते खराब केल्याचा आरोप केला आहे. (PHOTO: News18)


लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा या रस्त्यातून जाताना किंवा अंत्यसंस्कारासाठी जाताना लोकांना पडण्याची भीती असते. त्यामुळे या गावची लोकं ट्रॅक्टरमध्ये मृतदेह घेऊन जातात. (PHOTO: News18)


माजी सरपंच संदीप कुमार यांनी सांगितले की स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने लोक मृतदेहाला खांदा लावू शकत नाहीत. बहुधा अनुसूचित जातीच्या स्मशानभूमींमुळे आमदार किंवा डीसीपर्यंत सरपंच निराकरण करण्यात रस घेत नाहीत. (PHOTO: News18)