ट्रेनपासून ते प्लेनपर्यंत मुंबईतील पावसाचे लेटेस्ट अपडेट
|
1/ 18
मुंबई, 10 जुलै : कालपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचलं आहे. अनेक गावांशी संपर्क तुटला आहे तर अनेक सखोल भागात पाणी साचलं आहे.
2/ 18
मुसळधार पाऊसमुळे रेल्वेरूळावर पाणी साचल्यानं भाईंदर ते विरार रेल्वेसेवा पूर्णपणे बंद. भाईंदर ते चर्चगेट रेल्वेसेवा धिम्यागतीनं सुरू.
3/ 18
मुंबईत पावसाचा जोर लक्षात घेऊन मुख्यध्यापकांनी सुट्टी जाहीर करावी अशा सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत.
4/ 18
पश्चिम रेल्वे मार्गावर विरार ते बोरीवली रेल्वे वाहतूक ठप्प, नालासोपारात रेल्वे रुळावर पाणी
5/ 18
पश्चिम रेल्वे मार्गावरची एसी लोकल सेवा आज बंद
6/ 18
मुंबईच्या पावसामुळे विमान सेवेवर मोठा परिणाम, अनेक फ्लाईट्स रद्द
7/ 18
पुढील काही तासात ठाण्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याचा अंदाज. गरज असेल तरच घराबाहेर पडा मनपाचे ठाणेकरांना आवाहन
8/ 18
सकाळपासून कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची संततधार सुरूच. कल्याण-शीळफाटा रोडवर ट्रॅफिक जाम
9/ 18
पाणी साचल्याने सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी
10/ 18
नवी मुंबईला सलग चौथ्या दिवशी ही पावसाने चांगलेच झोडपून काढलंय. शहरातील नेरुळ, वाशी, बेलापूर, आणि ऐरोली मध्ये एकूण 135 मिली मिटर पावसाची नोंद झालीय. कधी नव्हे ते या वर्षी शहरातील सर्व सखल भागात पाणी तुंबलं आहे.
11/ 18
जागोजागी पाणी तुंबल्याने बेस्टच्या 60 बसेस 10 वेगवेगळ्या जागी वळवण्यात आल्या आहेत.
12/ 18
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी, गोरेगाव ते वांद्रेदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा, जोरदार पावसाने ट्रॅफिक जाम
13/ 18
14/ 18
हिंदमाता आणि परळमध्ये अनेक दुकानांमध्ये शिरलं पाणी
15/ 18
पश्चिम रेल्वेच्या दिल्ली, अहमदाबाद आणि जयपूर या रेलगाड्या अर्ध्यातून परत पाठवल्या.
16/ 18
पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ठिक-ठिकाणी पाणी साचले आहे. तरी शक्यतो गाडीचा वापर टाळावा, आवश्यक असेल तरच घरा बाहेर पडा.
17/ 18
वसई-विरार भागाला विजपुरवठा करणाऱ्या 'महापारेषण वसई अति उच्च दाब केंद्रा'च्या नियंत्रण कक्षामध्ये शिरलं पाणी
18/ 18
मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्याला हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.