कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ‘मास्क’ हा सर्वात प्रभावशाही उपाय आहे हे आता जगातल्या सर्वच तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणं हे सक्तिचं करण्यात आलं आहे. पण नागरिक तो नियम पाळत नाहीत त्यामुळे मुंबई महापालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) कारवाईकर करत मास्क न घालणाऱ्या बेशिस्त नागरिकांकडून 60 लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे.