

चहाचे आणि कॉफीचे प्रेमी काही कमी नाहीत. अनेकांना तर या पेयांचं व्यसनच असतं. चहा- कॉफी पिण्याचे फायदेही आहेत. कॉफीमुळे मधुमेहाचा धोका टळतो. याशिवाय कॉफीत एल्कॉइड नावाचं तत्त्व असतं ज्यामुळे मेंदू सक्रिय होण्यास मदत होते.


सकाळी उठल्यावर एक कप चहा किंवा कॉफी अनेकजण पितात. यामुळे त्यांना फ्रेशही वाटतं. दिवसातून अनेकदा चहा- कॉफी पिणारेही खूप आहेत. पण अचानक कॉफी पिणं बंद केलं तर शरीर कसं रिअॅक्ट करतं हे जाणून घेऊ.


तुम्ही अनेक वर्ष चहा- कॉफी पीत असाल आणि अचानक पिणं बंद केलं तर तुमचं शरीर असंतुलीत होतं. यामुळे त्या दिवसांमध्ये आळस आल्यासारखा वाटतो आणि दिवसभर माणूस निरुत्साही राहतो. यासोबतच त्या व्यक्तिची प्रोडक्टिव्हीटीही कमी होते.


तुम्ही दैनंदिन कामांना सुरुवात कराल, मात्र मानसिकरित्या तुम्हाला उत्साही वाटणार नाही आणि नकारात्मकता वाढत जाईल.


पूर्वीप्रमाणे विचार करू शकत नाही असं तुम्हाला सतत वाटत राहील. अशावेळी गोड फळं खावीत. अचानक एखादी वर्षांनीवर्षाची सवय मोडली तर त्याचा त्रास होतोच.