

बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याने क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबतचे मौन अखेर सोडले.


कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि केएल राहुल अडचणीत आले आहेत. यामुळे त्यांना ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडावा लागला. त्याचबरोबर त्यांना न्यूझीलंड दौऱ्याला मुकावे लागले.


आतापर्यंत करण जोहरने यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. पहिल्यांदाच करणने बोलताना यासाठी स्वत: जबाबदार असल्याचे सांगितले आहे.


हार्दिक आणि राहुलला कार्यक्रमात मी आमंत्रित केले होते. या शोमुळे त्यांना जो काही त्रास सहन करावा लागत आहे त्याला मी जबाबदार असल्याचे करण जोहरने म्हटलं आहे.


करण जोहर म्हणाला की, शोमधील वक्तव्याने हार्दिक पांड्या वादात अडकल्यापासून मी रात्रीचा नीट झोपू शकलेलो नाही. आता हे नुकसान कसं भरुन काढायचं हे मला कळत नाहीये.


माझ बोलणं कोणी ऐकून घेणार नाही. हे प्रकरण माझ्या हाताबाहेर गेलं असल्याचे करण जोहरने म्हटलं आहे.पुढे वाचा...'त्या' कमेंट्समुळे हार्दिक पांड्या आणि राहुलला BCCI ने बजावली नोटीस


क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांना क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.


कॉफी विथ करण या करण जोहरच्या टॉक शोमध्ये हार्दिक पांड्या आणि के. एल राहुल यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गप्पांच्या ओघात या दोघांनी केलेल्या लूज कमेंट्समुळे हे दोन खेळाडू अडचणीत आले आहेत.


हार्दिक पांड्यानं स्त्रियांविषयी केलेली वक्तव्य सेक्सिस्ट असल्याचे आरोप झाले आणि त्यावर पांड्याने माफीही मागितली. पण आता याची दखल BCCI ने घेतली आहे.


मला स्त्रियांच्या हालचालींचं निरीक्षण करायला आवडतं, अशा अर्थाचं वक्तव्य हार्दिक पांड्याने करण जोहरने विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केलं होतं.


BCCI ने हार्दिक आणि राहुल या दोघांनाही कारणं दाखवा नोटीस बजावली आहे आणि 24 तासात या दोघांनी त्याला उत्तर देणं अपेक्षित आहे, असं BCCIच्या सूत्रांनी सांगितलं.


बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहरचा टॉक शो कॉफी विथ करणमध्ये शोमध्ये टीम इंडियाचे दोन प्रसिद्ध खेळाडू केएल राहुल आणि हार्दिक पांड्या आले होते. शोमध्ये हार्दिकने सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली सर्वोत्तम फलंदाज असल्याचं सर्वात मोठं वक्तव्य केलं. त्यावर सोशल मीडियावर सचिनच्या चाहत्यांनी मोठा संताप व्यक्त केला होता.


सचिनच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हार्दिक पांड्यावर टीकेचा भडीमार केला. त्यावर आता हार्दिकने सगळ्यांची माफी मागितली आहे.


ट्विटरच्या माध्यमातून त्याने सगळ्यांनी माफी मागितली आहे. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या असं हार्दिक पांड्याने त्याच्या ट्विटमध्ये लिहलं आहे.


करण जोहर याच्या 'कॉफी विद करण'मध्ये पहिल्यांदाच भारतीय टीमचे दोन तडाखेबाज खेळाडू हार्दिक पांड्या आणि केएल राहुलने हजेरी लावली. यावेळी दोघांनी करणसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणिआपले खास सिक्रेट्सही शेअर केले आहे.


Koffee with Karan मध्ये पहिल्यांदाच सेलिब्रिटीनंतर कोणते तरी खेळाडू सहभागी झाले आहे. दोघांसोबत गप्पा मारल्यानंतर करणने 'याआधीच असं करायला पाहिजे होतं', असं म्हटलं आहे.


हार्दिक आणि केएल राहुलने करणसोबत आपल्या खासगी आयुष्यातील अनुभव सांगितले. हार्दिकचे नाव नेहमी कोणत्या ना कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत जोडले गेले आहे.


यावेळी आपल्या या अफेअरबद्दल हार्दिकने काही सांगितलं नाही, पण बॉलिवूडमध्ये आपल्या क्रशबाबत खुलासा केला आहे.


हार्दिकने सांगितलं की, 'करीना कपूरला आपल्याला डेट करायला आवडेल. करीना खूप दिवसांपासून माझी क्रश होती'.


परंतु, करणने सांगितलं की, ती विवाहित आहे, तर तो म्हणाला की, 'मी फक्त त्यांच्यासोबत बाहेर जावू इच्छित आहे, यात काही चुकीचं नाही,' असं तो म्हणाला.


या कार्यक्रमात हार्दिकने आपल्या शिक्षणाबद्दल बरंच काही सांगितलं. "मी फक्त 9 वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे आणि अनेक वेळा परिक्षेत नापास झालो आहे.",असंही त्याने सांगितलं.


"मी जेव्हा परिक्षेला जात होतो, तेव्हा उत्तरपत्रिकेवर फक्त रोल नंबर आणि नाव लिहून परत येत होतो", असा किस्साही त्याने सांगितला.


इंग्रजी थोड्याफार प्रमाणात लिहू शकतो आणि वाचू शकतो. त्याशिवाय हिंदी आणि गुजराती बिल्कुल येत नाही असंही हार्दिकने सांगितलं.


करणने रॅपिड फायर राउंडमध्ये दोघांना विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यापैकी सर्वोत्तम फलंदाज कोण असा प्रश्न विचारला असता दोघांनी विराट कोहलीचं नाव घेतलं. राहुलने ‘मी विराट म्हणेन’ असं उत्तर दिलं तर पांड्याने ‘फक्त विराट’ असं उत्तर दिलं.


याशिवाय हार्दिक पांड्या आणि केएल राहुलला विराट आणि एमएस धोनीमध्ये सर्वोत्कृष्ट कर्णधार कोण असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा या दोघांनीही धोनीचं नाव घेतलं. पांड्या म्हणाला की, मी धोनी कर्णधार असताना पदार्पण केलं म्हणून माझ्यासाठी तो सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे. तर केएल राहुल म्हणाला की, यश मिळवण्याबद्दल बोलायचे झाले तर धोनी सर्वोत्कृष्ट आहे.