अन्नपूर्णा देवी प्रसिद्ध संगीतकार होत्या. महान सितार वादक पंडित रविशंकर यांच्या त्या पहिल्या पत्नी. त्यांचं मूळ नाव रोशनारा खान होतं. संगीत क्षेत्रातील मैहर घराण्याचे संस्थापक अलाउद्दीन खान यांच्या त्या कन्या होत्या. पंडित रविशंकर त्यांच्या घरी संगीताचे प्रशिक्षण घेण्यासाठी आले. दोघेही प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी धर्म बदलून 15 मे 1941 रोजी अल्मोडा येथे त्यांच्याशी लग्न केलं. त्यांचं नाव आता अन्नपूर्णा देवी आहे.
अन्नपूर्णा सुरबहार या वाद्यात पारंगत होत्या. त्या स्वत: संगीतात निपुण होत्या. त्यानंतर त्यांनी अनेक प्रसिद्ध लोकांना संगीताचे प्रशिक्षण दिलं. हरिदास चौरसिया, नित्यानंद हल्दीपूर आणि निखिल बॅनर्जी हे त्यांचे शिष्य राहिले. सुरुवातीला रविशंकरही मंचावर सादरीकरणासाठी यायचे. मात्र, त्यानंतर त्यांनी रविशंकर यांच्यापासून घटस्फोट घेतला. रविशंकर आणि अन्नपूर्णा यांना शुभेंद्र शंकर नावाचा मुलगा होता. तो स्वतः उत्तम संगीतकार होता. रविशंकरपासून विभक्त होऊनही अन्नपूर्णा आयुष्यभर संगीत अभ्यासात गुंतून राहिली आणि हिंदू म्हणून जीवन जगली. 1982 मध्ये मुंबईत त्यांचं निधन झाले.
आशिष खान देवशर्मा हे सरोदवादनाचे प्रसिद्ध आणि महान संगीतकार होते. ते मुस्लिम होते. त्यांना 2006 मध्ये सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत श्रेणीत ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा जन्मही मैहर येथे झाला. त्यांना अनेक मोठे पुरस्कार मिळाले, ते कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स, कॅलिफोर्निया विद्यापीठ, यूएसए येथे भारतीय शास्त्रीय संगीताचे प्राध्यापक होते.
2006 मध्ये कोलकाता येथे एका पत्रकार परिषदेत आशिष खानने आपण हिंदू धर्म स्वीकारत असल्याची घोषणा केली. त्यांचे पूर्वज देवशर्मा असल्याने ते त्यांच्या जातीचे नाव वापरत असत. त्यांनी असेही सांगितले की त्याच्या कुटुंबाने कधीही अधिकृतपणे इस्लाम धर्म स्वीकारला नाही. मात्र, वडील अली अकबर खान यांनी त्यांचा दावा मान्य केला नाही. त्यांनी सांगितले की त्यांच्या मुलाने काहीही करावे पण मला त्यांचा दावा मान्य नाही. माझे कुटुंब नेहमीच मुस्लिम राहिले आहे. सध्या आशिष 82 वर्षांचे असून ते अमेरिकेत राहतात.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकारणात प्रवेश केलेल्या खुशबू सुंदर या पूर्वी काँग्रेसमध्ये होत्या. आता त्या भारतीय जनता पक्षात आहेत. दक्षिण भारतातील चित्रपटांशिवाय त्यांनी हिंदीतही अनेक चित्रपट केले. 29 सप्टेंबर 1970 रोजी मुंबईतील एका मुस्लिम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचं नाव नखत खान होते. जेव्हा त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटात पाऊल ठेवलं तेव्हा तिच्या पालकांनी तिचं नाव खुशबू ठेवले. गेल्या 36 वर्षांपासून त्या चेन्नईत राहतात. त्या अनेक वादातही अडकल्या आहेत. 2000 मध्ये जेव्हा त्यांनी दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सुंदर सी यांच्याशी लग्न केलं तेव्हा त्यांनी धर्म बदलला. त्या हिंदू झाल्या. त्यांना अवंतिका आणि आनंदिता नावाच्या दोन मुली आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस यांचं जन्माचं नाव फातिमा रशीद होते. त्यांचा जन्म 01 जून 1929 रोजी अलाहाबाद येथे झाला. पुढे त्यांनी फिल्मी दुनियेतील टॉप अभिनेत्री म्हणून नाव कमावलं. त्यानंतर राजकारणातही पाऊल ठेवले. भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना होते. संजय दत्तची आई आणि सुनील दत्तची पत्नी नर्गिस यांचे राज कपूरसोबत बरेच दिवस अफेअर होते. पण ते संपल्यावर त्यांनी सुनील दत्तसोबत लग्न केलं. त्यानंतर नर्गिसनेही तिचा धर्म बदलला. त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. संजय दत्तशिवाय नर्गिसला नम्रता आणि प्रिया या दोन मुली आहेत. नम्रताचा विवाह कुमार गौरवसोबत झाला असून प्रिया काँग्रेसच्या खासदार राहिल्या आहेत.