अभिनेत्रींसाठी लग्नाचं योग्य वय काय? 'हे' वाचून तुमचे सर्व भ्रम होतील दूर
अभिनेत्री अनुष्का शर्मानं लवकर लग्न करण्याविषयी खुलासा केल्यानंतर सगळीकडे अभिनेत्रींसाठी लग्नाचं योग्य वय नक्की कोणतं यावर खूप चर्चा झाली. पण अनेक अभिनेत्रींना लग्नासाठी योग्य वयाची गरज भासली नाही.


अभिनेत्री अनुष्का शर्मानं लवकर लग्न करण्याविषयी खुलासा केल्यानंतर सगळीकडे अभिनेत्रींसाठी लग्नाचं योग्य वय नक्की कोणतं यावर खूप चर्चा झाली. पण अनेक अभिनेत्रींना लग्नासाठी योग्य वयाची गरज भासली नाही. रिया सेननं वयाच्या 36 व्या वर्षी लग्न करून वयाचा भ्रम मोडीत काढला.


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय दादी सुहासिनी मुळे यांनी वयाच्या 60 वर्षी अतुल गुर्तु यांच्याशी लग्न केलं. सुहासिनी यांचं हे पहिलंच लग्न असलं तरीही अतुल यांचं मात्र याआधी लग्न झालं होतं. कॅन्सरमुळे पत्नीचं निधन झाल्यानंतर त्यांनी 2011 मध्ये सुहासिनी यांच्याशी लग्न केलं.


कोरिओग्राफर फराह खाननं वयाच्या 39 व्या लग्न केलं होतं. तिचा पति शिरीष कुंदर तिच्याहून 8 वर्षांनी लहान आहे. या दोघांनी 2004मध्ये लग्न केलं होतं.


बॉलिवूडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर हीनं वयाच्या 42 व्या वर्षी लग्न केलं होतं. तिचा पती मोहसिन मीर हा तिच्याहून लहान आहे.


अभिनेत्री प्रीती झिंटानं जेन गुडइनफ याच्याशी वयाच्या 41 व्या वर्षी लग्न केलं होतं. हे लग्न लॉस एंजेलिसमध्ये झालं होतं.


अभिनेत्री राणी मुखर्जीनं वयाच्या 36 व्या वर्षी प्रोड्यूसर आदित्य कपूर सोबत लग्न केलं. हे लग्न इटलीमध्ये झालं होतं. राणी आणि आदित्य यांना आद्या नावाची गोड मुलगी सुद्धा आहे.