चित्रपटसृष्टीत खूप कमी लोक आहेत ज्यांना संघर्ष करावा लागला नाही. मुंबईत पाय ठेवण्यासाठी लोकांना किती कष्ट करावे लागतात हे सर्वांनाच माहीत आहे. संघर्ष कधी कधी इतका लांबतो की ते परिस्थितीशी तडजोड करून घरी परतण्याचा बेत आखतात. धर्मेंद्रही असेच काहीतरी करणार होते, पण एका महान कलाकाराने त्यांना अडवलं.