2021 मध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी याच वर्षी अचानक घटस्फोटाची घोषणा केल्यामुळं सगळ्यांनाच धक्का बसला होता. त्याचबरोबर दक्षिण चित्रपटांतील प्रसिद्ध कपल अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी देखील विभक्त होण्याची घोषणा केली होती. त्यामुळं आता या वर्षी त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला होता.
अभिनेत्री आणि राजकारणी नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांनी तुर्कस्थानमध्ये मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलं होतं. परंतु त्यांचं वैवाहिक आयुष्य केवळ 2 वर्षे टिकलं. परंतु काही दिवसांपूर्वी नुसरतने अचानक घटस्फोट घेण्याची घोषणा केली होती. तिनं हे लग्न अवैध असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ती यश दासगुप्तासोबत रिलेशनमध्ये असल्याची माहिती समोर आली होती.
त्याचवेळी टीव्ही अभिनेत्री निशा रावलने तिचा पती अभिनेता करण मेहरा यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला तेव्हा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करणची प्रतिमा शांत पुरुषाची होती, मात्र निशाने करणवर मारहाणीचा आरोप केला आणि त्याच्यावर दुसऱ्या महिलेसोबत अफेअर असल्याचा आरोपही केला.