

सध्या घरच्यांच्याविरोधात जाऊन लग्न करणं ही काही मोठी गोष्ट राहिली नाही. मात्र २० ते ३० वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. आज आम्ही तुम्हाला अशा काही बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी पळून जाऊन लग्न केलं.


तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की आमिर खानने पळून जाऊन लग्न केलं होतं. आमिरची पहिली पत्नी रीना ही हिंदू असल्यामुळे दोघांच्याही घरातून या लग्नाला विरोध होता अखेर दोघांनी पळून जाऊन लग्न केलं.


शक्ती कपूर यांनी पद्मिनी कोल्हापुरेची बहीण शिवांगी कोल्हापुरेशी पळून जाऊन लग्न केलं. लग्नाच्यावेळी शिवांगी फक्त १८ वर्षांच्या होत्या.


शम्मी कपूर यांनी गीता बाली यांच्याशी पळून जाऊन लग्न केलं होते. गीता बाली या त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या शिवाय त्या शम्मी यांच्यापेक्षा एका वर्षाने मोठ्या होत्या.


शम्मी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत शशी कपूर यांनीही जेनिफर यांच्याशी पळून जाऊन लग्न केलं. जेनिफर तीन वर्षांनी शशी यांच्यापेक्षा मोठ्या होत्या.