Bigg Boss Marathi: घरामध्ये शेवटचा घुमला आज्जीचा आवाज! स्पर्धकांनी पाणावलेल्या डोळ्यांनी दिला निरोप
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या, जवळच्या व्यक्तीचचं आगमन झालं होतं.आणि ती व्यक्ति म्हणजे आजी. इतक्या कमी वेळामध्ये देखील सगळेच सदस्य आजीशी मनाने जोडले गेले हो
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या, जवळच्या व्यक्तीचचं आगमन झालं होतं.आणि ती व्यक्ति म्हणजे आजी. इतक्या कमी वेळामध्ये देखील सगळेच सदस्य आजीशी मनाने जोडले गेले होते.
2/ 7
सदस्यांनी आजीसोबत बराच वेळ घालवला. तिच्यासमोर थोडी भांडण देखील झाली. आजीचा खाऊ आणि धम्मक लाडू सगळ्यांनी मिळून खाल्लं. तिच्याशी गप्पा मारल्या. पण आज घरामधून आजीचा निरोप घेण्याची वेळ आली आहे.
3/ 7
आजीचा आवाज पुन्हा एकदा आणि शेवटचा घरामध्ये घुमणार आहे. यावेळी आजी म्हणाली, “मला इथे येऊन एक आठवडा झाला सुध्दा. चला म्हणजे आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या आजीला जे काही सांगायचे राहून गेलं असेल ते मला सांगा.”
4/ 7
आजीच्या या घोषणेनंतर प्रत्येक सदस्याला अश्रु अनावर झाले आहेत. सगळेच सदस्य अत्यंत भावुक झाले आहेत. आणि मीराने आपल्या भावना, खंत, तक्रार आजीसमोर मांडली आहे.
5/ 7
मीरा म्हणाली, “आजी माझी तक्रार आहे तुमच्याकडे खूप लवकर गेलात तुम्ही. जेव्हा पूर्ण जगाशी मी एकटी लढत होते, कोणीही नव्हतं माझ्याबरोबर तेव्हा मला वाटायचं.माझी आई देखील म्हणायची जर आजी असती तर तुझ्याबरोबर असती. मी जिथे राहिली असती तिथे ती राहिली असती.
6/ 7
अगदी १६ – १७ वयाची मी असताना तू गेलीस आणि त्याच्यानंतर सगळ्या जगासोबत मी एकटी लढली आहे तुझ्याशिवाय... पण इथे बिग बॉसच्या आजीला बघितल्यावर मला एक वेगळं असं कनेक्शन वाटलं होतं..म्हणजे समोर आहे बसं एकवढचं हवं आहे, बाकी काही नसेल तरी चालेल. बसं दिसतं राहा कधी कधी...
7/ 7
त्यांनतर अजून कोणत्या सदस्यांनी आपल्या मनातल्या भावना आजीसमोर आज व्यक्त केल्या ते आजच्या भागामध्ये.आपल्याला पाहायला मिळणार आहे.