कोरोना रुग्णांची आकडेवारी सध्या कमी झाली आहे. देशाप्रमाणे महाराष्ट्राचाही आकडाही दिलासादायक आहे. राज्यातील नव्या रुग्णांचं प्रमाण कमी झालं आहे. पण त्याचवेळी मृत्यूदर मात्र वाढताना दिसतो आहे.
2/ 5
राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या अहवालातून कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा जास्त आहे.
3/ 5
राज्यातील दैनंदिन रुग्णवाढीचा दर हा 31 मे, 2021 रोजी 0.37 होता जो 27 सप्टेंबर, 2021 ला 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा अर्थ रुग्णवाढ लक्षणीयरित्या कमी झाली आहे. रुग्ण बरं होण्याचं प्रमाणही 97.26 टक्क्यांवर पोहोचलं आहे.
4/ 5
पण त्याचवेळी मृत्यूदर मात्र वाढला आहे. 31 मे रोजी 1.66 टक्क्यांवर असलेला मृत्यू 31 ऑगस्टला 2.12 वर पोहोचला. जो 27 सप्टेंबरला वाढला नाही. पण कमीही झालेला नाही. जैसे थेच राहिला आहे.
5/ 5
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील कोरोनाचा मृत्यूदर हा जगातील कोरोना मृत्यूदरापेक्षाही जास्त आहे. जगातील कोरोना मृत्यूदर हा 2.05 टक्के आहे पण महाराष्ट्रात हा 2.12 आहे.