
अशी अनेक जोडपी आहेत ज्यांची ब्रेकअप होऊन त्यांनी पुन्हा पॅचअप केले. पण अशीही काही जोडपी असतील जे अजून पुन्हा पॅचअप करण्याचा फक्त विचारच करत असतील.

अनेकदा छोट्या कारणांमुळे जोडप्यांमध्ये ब्रेकअप होतात. मनात पार्टनरबद्दल असलेली कटुता, समजून घेण्याची मानसिकता नसणे, तसेच स्वतःला योग्य आहे असं पटवून देण्यासाठी साथिदाराला खोटं ठरवणं अशा कारणांमुळे अनेक जोडप्यांचे ब्रेकअप होत असते.

पण जर तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या नात्याला संधी द्यायची असेल तर आज आम्ही तुम्हाला आपल्या एक्ससोबत पुन्हा जुळून घेण्यासाठी सध्याच्या लॉकडाउनचा योग्य वापर करा.

गैरसमज दूर कराः आपल्या पार्टनरसोबत पुन्हा एकदा एकत्र यायचं असेल तर पहिल्यांदा ब्रेकअप का झालं होतं याचं कारण शोधा. ज्या कारणामुळे ब्रेकअप झालं होतं त्यावर चर्चा करून त्यातून उपाय काढण्याचा प्रयत्न करा. दोघांमध्ये जे काही गैरसमज असतील तेही मिटवण्याचा प्रयत्न करा.

स्वतःचं कर्तव्य समजाः नातं कोणतंही असो नातं टिकवणं सर्वात महत्त्वाचं असतं. जर दोघांनीही आपआपल्या जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडल्या तर ब्रेकअप होणारच नाही. त्याच व्यक्तीसोबत दुसऱ्यांदा नातं सुरू करण्यासाठी स्वतःची कर्तव्य समजून ब्रेकअपची जबाबदारी घेणं आवश्यक आहे.

प्रामाणिकपणाः अनेकदा आपले पार्टनरसोबत कोणत्याना कोणत्या गोष्टीवरून भांडण होत असते. पण अशावेळी पार्टनरशी खोटं बोलण्यापेक्षा जे खरं आहे ते सांगावं. जर तुम्ही प्रामाणिकपणे तुम्ही सर्व काही खरं सांगितलं तर तुमचा साथिदार तुमच्यावर नाराज होणार नाही.

विश्वासः कोणतंही नातं टिकवण्यासाठी त्या नात्यात विश्वास असणं फार महत्त्वाचं असतं. नेमकी जर हाच विश्वास नात्यात नसेल तर नातं फार काळ टिकत नाही. त्यामुळे तुमच्या साथिदाराला पुन्हा एकदा विश्वास द्या की आधी झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत.

वेळ देणं- स्वतःची चूक स्वीकारल्यानंतर पार्टनरला विचार करायला थोडा वेळ द्या. तुम्ही जर साथीदाराला एकच प्रश्न सातत्याने विचारत राहिलात तर तो नाराज होऊ शकतो. दुसऱ्यांदा विश्वास ठेवण्यासाठी प्रत्येकालाच थोडा वेळ लागतो. तो वेळ साथीदाराला देणं गरजेच आहे. त्यामुळे त्यांच्या मागे एकाच गोष्टीसाठी लागू नका. (संकलन : मेघा जेठे.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.