23 डिसेंबर, जयपूर : राजस्थानातील सवाई माधोपूर जिल्ह्यात बनास नदीत प्रवासी बस कोसळून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. हलगर्जी आणि बेदरकारपणे बस चालवल्यामुळे ही प्रवासी बस पुलावरून नदीत कोसळल्याची माहिती मिळतेय. शनिवारी सकाळी प्रवाशांनी भरलेली बस बनास नदीवरील पुलावरुन भरधाव वेगात जात असतानाच चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही भरधाव बस पुलाचे कठडे तोडून बस नदीत कोसळली.
अपघातात 26 प्रवाशांना जलसमाधी मिळालीय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतेय. मृतांमध्ये तीन महिला आणि तीन बालकांचा समावेश आहे. पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. थंडी, त्याचप्रमाणे नदी खोल असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
Rajasthan: 12 people dead, 24 injured after a bus carrying passengers fell of a bridge into a river, in Sawai Madhopur's Dubi pic.twitter.com/TF724GkboW
— ANI (@ANI) December 23, 2017
Rajasthan: #Visuals from the site of accident in Dubi, Sawai Madhopur ; 12 people dead, 24 injured after a bus carrying passengers fell of a bridge into a river pic.twitter.com/7pruEkOjmc
— ANI (@ANI) December 23, 2017
>>