नवी दिल्ली, 19 मे : लोकसभा निवडणूक 2019 ची निकाल 23 मे रोजी स्पष्ट होणार आहेत. सातही टप्प्यावरील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता देशात कोणता पक्ष सरकार स्थापन करणार ? याकडे देशवासीयांचं लक्ष लागून राहिलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सर्व सात टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. 'News Nation'च्या एक्झिट पोलनुसार NDAला 286 जागा, UPAला 122 जागा तर अन्य पक्षांना 134 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखाली फिर एक बार एनडीएआपलं सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे.
EXIT POLL : Republic च्या सर्व्हेत पुन्हा मोदी सरकार; पाहा काँग्रेसला मिळणार किती जागा?
तर, सीव्होटर (CVoter) आणि रिपब्लिक टीव्हीने (RepublicExitPoll) केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे.
असा आहे रिपब्लिकचा अंदाज
NDA - 305
UPA 124
सपा-बसपा महागठबंधन 26
अन्य -87
महाराष्ट्र पहिल्या टप्प्यात 7
पाहा :EXIT POLL VIDEO : सुळे की कूल, खैरे की जलील; कोण जिंकणार?
महाराष्ट्रात महाआघाडीला धक्का
तर दुसरीकडे, 'टाईम्स नाऊ'च्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीला 38 जागा तर महाआघाडीला केवळ 10 जागा मिळतील. महाआघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 'टीव्ही 9'च्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात भाजपला 19 जागा, शिवसेना 15 जागा, काँग्रेस 8 जागा आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळतील. महाआघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
वाचा : Exit Poll 2019 : या राज्यांमध्ये चाणक्यची भाजपला ‘क्लिन स्वीप’
'एबीपी न्यूज' चा EXIT POLL : महाराष्ट्रात भाजपला नुकसान, राष्ट्रवादीची मुसंडी
'एबीपी न्यूज'च्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीला 34 तर महाआघाडीला केवळ 14 जागा मिळतील. यामध्ये भाजपला 17, शिवसेनेला 17 तर काँग्रेसला 4 ,राष्ट्रवादी 9 जागा आणि इतर 1 असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.महाआघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादीची मुसंडी
राष्ट्रवादीला मागच्या निवडणुकीत अवघ्या 4 जागा मिळाल्या होत्या. त्या वाढून 9 जागांवर राष्ट्रवादी मजल मारेल, असा अंदाज या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे, काँग्रेसची निराशाजनक कामगिरी कायम असल्याचं दिसत आहे.
काँग्रेसला मोठा धक्का, वंचित आघाडी इफेक्ट दिसला?
महाराष्ट्रात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळाली. महायुती आणि महाआघाडी यांच्यात थेट लढत होईल, असं सुरुवातीचं चित्र होतं. पण नंतर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीची एण्ट्री झाली. त्यामुळे या निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. पण लोकसभा निवडणुकीसाठी सर्व सात टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोल समोर आले आहेत.
'न्यूज18' ने केलेल्या एक्झिट पोलनुसार, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रात एकही जागा जिंकता येणार नाही. प्रकाश आंबेडकर हे स्वत: सोलापूर आणि अकोला मतदारसंघात लढत आहेत. मात्र तिथंही त्यांना अपयश येईल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. तर विदर्भात वंचितमुळे काँग्रेसलाही फटका बसताना दिसत आहे. काँग्रेसनेही विदर्भात खातं खोललं नाही, असं या पोलमधून दिसत आहे. दलित मतांमधील विभागणीमुळे काँग्रेसला धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
वाचा : EXIT POLL : अकोला आणि सोलापूर...प्रकाश आंबेडकर पराभवाच्या छायेत
बहुमताचा जादुई आकडा 272
कोणत्याही पक्षाला बहुमतासाठी 272 जागा आवश्यक असतात. जर बहुमतासाठी काही जागा कमी पडत असतील तर मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन करता येऊ शकते. राजकीय पक्ष निवडणुकांपूर्वी किंवा निवडणुकांनंतर एकत्र येऊन आपलं सरकार स्थापन करू शकतात.
विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळतं?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी एकूण जागेच्या किमान 10 टक्के जागा जिंकणं आवश्यक असतं. किमान 55 जागा असतील तरच विरोधी पक्षनेते पद मिळवता येतं. 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला फक्त 44 जागांवर विजय मिळवता आला होता.
लोकसभा निवडणूक 2014 : मोदी लाट
2014मध्ये देशात नऊ टप्प्यांमध्ये तर महाराष्ट्रात तीन टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीचे निकाल 16 मे 2014 रोजी लागले होते. 2014च्या निवडणुकीत एकट्या भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. पण सध्याची भाजपची सदस्य संख्या 268 एवढी आहे.
वाचा :पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या सातव्या टप्प्यातही हिंसाचाराचं गोलबोट
लोकसभा निवडणूक 2014 जागा 543
पक्ष जागा टक्केवारी
भाजप 282 31.04 टक्के
काँग्रेस 44 19.27 टक्के
एडीएमके 37 3.27 टक्के
टीएमसी 34 3.85 टक्के
बीजेडी 20 1.72 टक्के
शिवसेना 18 1.86 टक्के
टीडीपी 16 2.49 टक्के
अन्य 92 36.26 टक्के
पाहा :VIDEO : वाराणसीत मोदींनी काय काम केलं? काँग्रेस उमेदवाराने केला खुलासा
लोकसभा निवडणूक 2019 : 7 टप्प्यात पार पडलं मतदान
पहिला टप्पा : 20 राज्यांतील 91 मतदारसंघ
दुसरा टप्पा : 14 राज्यांतील 97 मतदारसंघ
तिसरा टप्पा : 14 राज्यातील 115 मतदारसंघ
चौथा टप्पा : 9 राज्यातील 71 मतदारसंघ
पाचवा टप्पा : 7 राज्यांत 51 मतदारसंघ
सहावा टप्पा : 7 राज्यातील 59 मतदारसंघ
सातवा टप्पा : 8 राज्यातील 59 मतदासंघ
वाचा :रावसाहेब दानवेंनी आपल्या लायकीनुसार काम करावे; कैलास गोरणत्यालांची बोचरी टीका
तर दुसरीकडे आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तराखंड, अंदमान-निकोबार, दादरा-नगरहवेली, दमण-दीव, लक्षद्वीप, दिल्ली, चंदिगडमध्ये एकाच टप्प्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली.
तर महाराष्ट्र राज्यात चार टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडली. तर 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
VVPAT यंत्रांची सुविधा
विशेष म्हणजे यंदा सर्व मतदान केंद्रांवर VVPAT यंत्र बसवण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव मतदारांना मोबाइल, बॅग्स अन्य कोणते सामनाही केंद्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली होती.
News 18-IPSOS Exit Pollचे अचूक अंदाज
लोकसभेच्या निकालांच्या आधी 'न्यूज18' आणि IPSOS यांनी मिळून देशातला सर्वात विश्वसनीय Exit Poll केला आहे. त्यात देशातल्या जवळपास सर्वच राज्यातल्या मतदारांच्या मनाचा कौल जाणून घेण्यात आला आहे. यात लोकसभेच्या 543 जागांपैकी 199 जागांची निवड करण्यात आली. देशातल्या 28 राज्यांमधल्या 199 मतदारसंघातल्या 796 विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांचा कौल घेण्यात आला. यात 4776 मतदान केंद्रातून 25 मतदारांची निवड करण्यात आली.
या प्रक्रियेत विविध मतदारसंघातल्या मतदान केंद्रांवरच्या मतदारांना विविध प्रश्न विचारण्यात आलेत. 199 लोकसभा मतदारसंघात किमान दीड लाख लोकांची मतं जाणून घेण्यात आलीत. या मतदार संघांची निवड करतानाही विशेष काळजी घेण्यात आली. ज्या मतदार संघात जो उमेदवार सलग दोन किंवा तीन वेळा निवडून आला असेल किंवा जिथे विजयातलं अंतर कमी असेल, ज्या ठिकाणी प्रत्येक वेळेस वेगळे निकाल लागतात, ज्या ठिकाणी दिग्गज नेते निवडणूक लढवत आहेत, अशा विविध मतदारसंघांची निवड करण्यात आली.
त्याचबरोबर प्रत्येक लोकसभा मतदार संघातल्या चार किंवा सहा विधानसभा मतदार संघातल्या सहा मतदान केंद्रातून विविध मतदारांची निवड करण्यात आली. मतदान केंद्रातून बाहेर पडलेल्या प्रत्येक तिसऱ्या मतदाराला हे प्रश्न विचारण्यात आले. यात विविध वयोगट, भाषा, संस्कृती आणि भौगोलिक क्षेत्राचा विचार करण्यात आला. अचूक Exit Poll येण्यासाठी ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्या सर्व घटकांची काळजीही घेण्यात आली.
SPECIAL REPORT: मोदींनी तप केलेल्या गुहेत 'हे' शुल्क देऊन तुम्हीही करू शकता ध्यानधारणा