24 जून : राज्यात अखेर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलीये. शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफ करण्यात आलंय. कर्जमाफीसाठी 34 हजार कोटींची कर्जमाफीला सरकारने मंजुरी दिलीये. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत कोणत्या घोषणा केल्यात पाहुया...
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
34,000 कोटींची कर्जमाफीला कॅबिनेटची मंजुरी
1,50,000 कर्जमाफी सरसकट
८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी, दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ
या निर्णयामुळे 90 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार
ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले आहे त्यांचे मध्यम मुदतीचे कर्ज देखील माफ
या निर्णयामुळे 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार
6 टक्के शेतकऱ्यांना ओटीएसखाली आणणार
पीककर्जासोबत मध्यम कर्जही माफ टर्म लोन माफ
जे शेतकरी नियमित कर्ज भरातात त्यांना 25 टक्के म्हणजेच 25,000 कमाल मर्यादा प्रोत्साहन भत्ता जमा करणार
तेवढं कर्ज कमी भरलं तर तेवढ्या पैशांची हमी सरकार घेऊन तेवढे पैसे अनुदान म्हणून त्यांच्या खात्यात भरणार
बँकांशी टायअप करून त्यांचे हप्ते पाडून पैसे परत करणार
कर्जमाफी ही 'छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना' या योजनेनं अोळखली जाणार
राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना लाभ नाही
मंत्री आणि आमदारांनी त्यांचा 1 महिन्याचा पगार कर्जमाफीसाठी देण्याचा निर्णय घेतलाय.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी 2007 सालीच लागू झाल्यात
पैसे आणण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागणार
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा