तसंच, 'कांदाचे भाव वाढले पाहिजे. कारण हा 70 वर्षांचा अनुशेष आहे. शेतकऱ्यांचा हा अनुशेष भरून निघाला पाहिजे. ज्यांना कांदा परवडत नसेल त्यांनी लसूण आणि मुळा खावा. आता मीडियाने सुद्धा गृहिनीचे बजेट कोलमडले असे सांगू नये, असेही यावेळी कडू यांनी सांगितले. मात्र, हा कांदा शेतकऱ्यांचा नसून आयात केलेला कांदा आहे. मग आयात केलेल्या कांद्याचा शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होईल, असाही प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थितीत केला. दरम्यान, कांद्याचे भाव वाढत असल्याने सरकारने काही आठवड्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरुद्ध टीकाही झाली होती. आता सण आणि उत्सवांचे दिवस सुरू झाल्याने कांद्यांची मागणी वाढत असते. त्या काळात महागाई होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. कांद्याची निर्यात थांबली तर भाव आटोक्यात येतील असा अंदाज होता. मात्र, ज्या प्रमाणात भाव कमी व्हायला पाहिजे त्या प्रमाणात ते नियंत्रणात येत नव्हते.कांद्याचे भाव वाढले म्हणून सामान्य नागरिकांनी बोंबलू नये,ज्यांना परवडत नसेल त्यांनी लसण,मुळा खावा, बच्चू कडू यांचा सल्ला pic.twitter.com/PApX1JKNIN
— News18Lokmat (@News18lokmat) October 21, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.