रोहितनं गेल्यावर्षी इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाकडून सर्वाधिक रन केले होते. त्यानं चार मॅचमध्ये एका शतकासह 368 रन केले. त्याची सरासरी 52.27 होती. टीम इंडिया या सीरिजमध्ये 2-1 नं पुढे आहे. 2007 साली भारतीय टीमनं इंग्लंडमध्ये शेवटची टेस्ट सीरिज जिंकली होती. 15 वर्षानंतर भारताला सीरिज जिंकण्यासाठी फक्त डॉची गरज आहे. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी देखील ही टेस्ट खूप महत्त्वपूर्ण आहे. 1983 वर्ल्ड कपची कपिल देव यांची टीम आणि आजची रणवीर 'सेना', खास PHOTOS 'टीम इंडियाचा मुख्य स्पिनर आर. अश्विनलाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो अन्य खेळाडूंसह लंडनला गेला नव्हता. आता अश्विन बरा झाला असून तो पहिल्या टेस्टमध्ये खेळण्याची शक्यता आहे. माजी कॅप्टन विराट कोहलीलाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. विराटही कोरोनामधून बरा झाला असून तो सराव सामन्यात खेळत आहे.UPDATE - #TeamIndia Captain Mr Rohit Sharma has tested positive for COVID-19 following a Rapid Antigen Test (RAT) conducted on Saturday. He is currently in isolation at the team hotel and is under the care of the BCCI Medical Team.
— BCCI (@BCCI) June 25, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, India vs england, Rohit sharma, Team india