यावर्षी 2 टप्प्यात स्पर्धा? रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) ही भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत 38 टीम भाग घेतात. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार 13 जानेवारी रोजी ही स्पर्धा सुरू होणार होती. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. आता रणजी ट्रॉफी स्पर्धा 2 टप्प्यात घेण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरूण धूमल यांनी दिली आहे. IPL 2022 : मुंबई इंडियन्सला दिलासा, BCCI करणार 'त्या' निर्णयावर शिक्कामोर्तब 'आम्ही रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळवण्याच्या सर्व शक्यतांचा विचार करत आहोत. आमची नियामक टीम या विषयावर काम करत आहे. पुढच्या महिन्यात या स्पर्धेचा पहिला टप्पा खेळवण्याचा विचार सुरू आहे. दुसरा टप्पा आयपीएल नंतर पूर्ण होऊ शकतो. सध्याच्या योजनेनुसार रणजी ट्रॉफीचे साखळी सामने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होतील. तर पुढचा टप्पा जून आणि जुलै महिन्यात आयोजित केला जाईल.' असे त्यांनी स्पष्ट केले.The Ranji Trophy is the backbone of Indian cricket. The moment you start ignoring it our cricket will be SPINELESS!
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) January 28, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket news, Ravi shastri