चेन्नई,ता.30 मे: दुसरीपर्यंत विद्यार्थ्यांना होमवर्क म्हणजेच गृहपाठ देऊ नका असा महत्त्वाचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयानं दिलाय. तसेच शाळेत त्यांच्यावर गणित आणि भाषा याशिवाय अन्य कोणत्याही विषयांची सक्ती करु नये असं देखील न्यायालयानं आपल्या निर्णयात म्हटलंय.
तसंच तिसरी आणि चौथी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना फक्त पर्यावरण हा अतिरिक्त विषय असावा, असेही उच्च न्यायालयाच्या निर्णयात नमूद करण्यात आलंय.
सीबीएसई शाळांमध्ये एनसीईआरटीने प्रकाशित केलेल्या पुस्तकांची सक्ती करावी अशी मागणी करणारी याचिका एम. पुरूषोत्तम यांनी केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान गृहपाठाच्या ओझ्याखाली दबलेल्या मुलांना दिलासा देणारा निर्णय मद्रास उच्च न्यायालयानं दिलाय.
चांगलं शिक्षण देण्याच्या नावाखाली आता अगदी पहिलीपासून मुलांवर पुस्तकांचा मारा करण्यात येतो. त्या प्रत्येक पुस्तकासाठी वेगळी वही. वर्कबुक्स आणि इतर शालेय साहित्यामुळं मुलांचं दप्तर हे त्याची पाठ वाकवणारं असतं. मुलांची बुद्धी चौकस व्हावी त्यांना वेगळ्या पद्धतीनं विचार करण्याची सवय लागावी यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरू शकतो.
काय म्हणालं मद्रास हायकोर्ट?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chennai, Classes first, Classes second, Madras High Court, School bag मद्रास हायकोर्ट, School bags, School children, गृहपाठ, चेन्नई, दप्तरांचं ओझं, मुलं, शाळा