नवी दिल्ली, 08 जुलै : पाकिस्तानी (Pakistan) तुरुंगात कैद असलेले भारतीय नागरिक आणि माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबद्दल पाकिस्तान सरकारने आता अजब दावा केला आहे. कुलभूषण जाधव यांनी फेर याचिका दाखल करण्यास नकार दिला, असा दावा पाक सरकारने केला आहे.
कुलभूषण जाधव हे 2016 पासून पाकिस्तानच्या तुरूंगात आहेत. कुलभूषण जाधव हे हेरगिरी करणारा असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. पण हा दावा भारतानं बर्याच वेळा नाकारला आहे. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकिस्तानी सुरक्षा दलांनी 3 मार्च 2016 रोजी बलुचिस्तानला कुलभूषण यांना अटक केली. सन 2017 मध्ये भारतानं आयसीजेकडे हे प्रकरण सोपावलं. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोर्टानं पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांना कॉन्सुलर प्रवेश (Consular Access)देण्याची आणि फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्यास सांगितलं.
'ते' दोघे आणि 2000 हुन अधिक जण क्वारंटाइन, बीडमधील धक्कादायक घटना
पाकिस्तानची कायदेशीर यंत्रणा ही सैन्य शासित आणि सरकार शासित आहे आणि त्यांच्याकडे कोणत्याही कायदेशीर चौकटीचे किंवा आंतरराष्ट्रीय मापदंडांचे कोणतेही मूल्य नाही. त्यामुळे जाधव प्रकरणातील सर्व दरवाजे उघडे आहेत. पाकिस्तानचा कोणताही निर्णय किंवा आदेश हा आयसीजेच्या निदर्शनात आणला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, मध्यंतरी 3 मे रोजी कुलभूषण जाधव यांना परत आणण्यासाठी बॅक चॅनलवरून सरकारला अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न झाला असल्याचा खुलासा ज्येष्ठ वकिल हरीश साळवे यांनी केला होता. या प्रकरणात साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) भारतीय समुपदेशक होते. ते भारताचे माजी सॉलिसिटर जनरल देखील आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या कोर्टानं एप्रिल 2017मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्ताननं त्यांच्यावर भारताचे हेरगिरी असल्याचा आरोप केला आहे.
'आम्ही आशा केली की, जर मागच्या दाराने त्यांनी पाकिस्तानशी चर्चा केली तर आम्ही त्यांना पटवून देऊ. आम्ही त्यांना मानवतेच्या आधारे सोडून देण्याविषयी बोलत होतो. पण तसं झालं नाही. वास्तविक कुलभूषण जाधव यांचं प्रकरण पाकिस्तानसाठी प्रतिष्ठेचा विषय बनलं होतं.' असंही साळवे यांनी सांगितलं होतं.