नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर: बालाकोट(Balakot) एअरस्ट्राइक(Airstrike)नंतर पाकिस्तान(Pakistan)कडून झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Vardhaman)यांच्या स्क्वाड्रन 51चा विशेष सन्मान केला जाणार आहे. एअर चीफ मार्शल आर.के.एस.भदोरिया यांच्याकडून अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचा सन्मान केला जाणार आहे. त्याच बरोबर स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल (squadron leader minty agarwal)यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. अग्रवाल यांनी बालाकोट येथे झालेल्या सर्जिकल स्ट्राईक यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमीका पार पाडली होती. बालाकोट येथील मोहीम गुप्त ठेवण्यासाठी त्याचे नाव 'ऑपरेशन बंदर' असे ठेवण्यात आले होते.
The number 9 squadron whose Mirage 2000 fighter aircraft carried out the Balakot aerial strikes on February 26 during 'Operation Bandar', also to be awarded unit citation. https://t.co/8yL6uWaWa9
— ANI (@ANI) October 6, 2019
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या जवानांवर आत्मघाती हल्ला झाला होता. या हल्ल्यात 40 जवान शहिद झाले होते. त्यानंतर 13 दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटयेथे सर्जिकल स्ट्राईक करत दहशतवाद्यांचा नायनाट केला होता. एअल स्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-21 विमानाने पाकिस्तानचे एफ-16 हे विमान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाडले होते. ही कामगिरीपार पाडत असताना अभिनंदन यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले. पाकने त्यांना दोन दिवस ताब्यात ठेवले होते. त्यानंतर भारत सरकारने कठोर भूमिका घेतल्याने पाकने त्यांची सुटका केली. अभिनंदन यांनी दाखवलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना वीर चक्र पुरस्कार जाहीर झाला. वीर चक्र हा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.
Squadron Leader Minty Agarwal’s 601 Signal unit to be awarded the unit citation for their role in Balakot aerial strikes and for thwarting the aerial attack by Pakistan on February 27. (file pic) pic.twitter.com/Lvih07Ud7P
— ANI (@ANI) October 6, 2019
स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांची महत्त्वाची भूमिका
बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. याआधीच त्यांना युद्ध सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 26 फेब्रुवारी रोजी मिंटी अग्रवाल यांनी पाकिस्तानी वैमानिकांच्या तोंडचे पाणी पळवले होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा