मराठी बातम्या /बातम्या /देश /या 4 घटनांमुळे नितीश कुमारांना भाजपसोबतची युती संपवायला भाग पाडले का? Inside Story वाचा

या 4 घटनांमुळे नितीश कुमारांना भाजपसोबतची युती संपवायला भाग पाडले का? Inside Story वाचा

Bihar Politics: आता बिहारमध्ये सत्तेवर येणार्‍या युतीमध्ये 164 आमदारांसह 7 पक्षांचा समावेश आहे, जो 2015 च्या युतीपेक्षा खूप मोठा आहे. यावरून बिहारमधील सर्व विरोधी पक्ष राज्यातील भाजपचा वाढता शिरकाव रोखण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येते.

Bihar Politics: आता बिहारमध्ये सत्तेवर येणार्‍या युतीमध्ये 164 आमदारांसह 7 पक्षांचा समावेश आहे, जो 2015 च्या युतीपेक्षा खूप मोठा आहे. यावरून बिहारमधील सर्व विरोधी पक्ष राज्यातील भाजपचा वाढता शिरकाव रोखण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येते.

Bihar Politics: आता बिहारमध्ये सत्तेवर येणार्‍या युतीमध्ये 164 आमदारांसह 7 पक्षांचा समावेश आहे, जो 2015 च्या युतीपेक्षा खूप मोठा आहे. यावरून बिहारमधील सर्व विरोधी पक्ष राज्यातील भाजपचा वाढता शिरकाव रोखण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येते.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : JDU प्रमुख नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वी 'भाजपकडून माझा सतत अपमान झाला'.. हे शब्द आहेत नितीश कुमारांचे. भाजपसोबतची पाच वर्षांची युती संपवण्यापूर्वी त्यांनी मंगळवारी पक्षाच्या आमदारांसमोर आपली भावना व्यक्त केली. जेडी(यू) नेते नितीश कुमार युती तुटण्यास चार प्रमुख घटना कारणीभूत असल्याचं सांगितले. या चार घटनांमुळे नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा रादज, काँग्रेस आणि इतर पक्षांसोबत आघाडी करत नवीन सरकार स्थापन केले.

2020 च्या निवडणुकीत भाजपने स्वयंघोषित 'मोदी के हनुमान' चिराग पासवानच्या मदतीने JD(U) चे नुकसान केले हे पहिले त्यांनी पाहिले. नितीश यांच्या पक्षाला केवळ 43 जागांवर समाधान मानावे लागले. दुसरी नितीश कुमार यांना न आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे माजी JD(U) नेते आरसीपी सिंग यांचा वर्षभरानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश. तिसरा मुद्दा जात जनगणनेशी संबंधित आहे. केंद्र सरकार देशभरात जात जनगणनेच्या विरोधात होते. मात्र, असे असतानाही नितीश यांनी गेल्या वर्षी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. युती तुटण्याच्या घटनेतील हा तिसरा खिळा होता. यानंतर गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील घडामोडींनी त्यांना घाबरवले. उद्धव ठाकरेंसारखी आपली अवस्था होऊ नये, असं नितीश यांना वाटत होतं.

..म्हणून सर्व विरोधक एकत्र

मात्र, त्यांच्या या निर्णयाचा अर्थ काही वेगळाच आहे. किंबहुना बिहारमध्ये आजकाल विरोधी पक्ष एकत्र येऊन राज्यातील 'मंडल' कथेला पुनरुज्जीवित करत आहेत. याद्वारे भाजपचा मुकाबला करण्यासाठी जातीवर आधारित राजकारण मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी बिहारच्या इतर पक्षांसह नितीश आणि तेजस्वी यादव यांनी पंतप्रधानांकडे शिष्टमंडळ घेऊन जात जनगणनेची मागणी केली तेव्हा त्याचा ट्रेलर दिसला. केंद्राने नकार दिल्यावर कुमार यांनी बिहारमध्ये जात जनगणना सुरू करण्याचा निर्णय घेतला, ज्याला भाजपसह बिहारमधील सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. बिहारची ही जात जनगणना 2024 च्या पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

'जिया हो बिहार के लाला..' नितीशकुमारांचा रेकॉर्ड, आठव्यांदा बनले मुख्यमंत्री!

भाजपच्या हिदुत्वाला देणार शह?

भाजपने उत्तर प्रदेशातील सर्व जातींच्या हिंदू मतदारांना एकत्र करण्यासाठी 'राष्ट्रवादी' आणि 'हिंदुत्व' आवाहनांचा वापर केला, समाजवादी पक्ष आणि बसपा सारख्या प्रादेशिक जाती-आधारित पक्षांना राज्याच्या राजकारणात धक्का बसला. कुमार यांना भीती होती की बिहारमध्येही अशीच गोष्ट घडत आहे, भाजपने आपला पाया वाढवला आहे आणि अलीकडेच राज्यातील सर्व 243 विधानसभा जागांसाठी निवडणूक रणनीती आखली आहे. JD(U) आणि RJD यांना जातीच्या आधारावर निवडणूक लढवायची आहे. 2015 मध्ये आरएसएस प्रमुखांच्या आरक्षणाच्या विधानाचा फायदा घेत दोन्ही पक्षांनी विजय मिळवला. 2015 मध्ये लालू प्रसाद यांनी बिहारमध्ये सत्तेत आल्यास भाजप आरक्षणाचा आढावा घेईल आणि आरक्षण रद्द करेल असे सांगून मतदारांना युतीच्या बाजूने आकर्षित केले.

आता बिहारमध्ये सत्तेवर असलेल्या युतीमध्ये 164 आमदारांसह 7 पक्षांचा समावेश आहे - 2015 च्या युतीपेक्षा खूप मोठी. यावरून बिहारमधील सर्व विरोधी पक्ष राज्यात भाजपचा वाढता प्रवेश रोखण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येते. राज्यातील जातीय समीकरण RJD-JD(U) नेतृत्वाखालील युतीच्या बाजूने आहे. परंतु, भाजप विकास, स्थैर्य, भ्रष्टाचारविरोधी आणि कायदा व सुव्यवस्था या मुद्द्यांवर मतदारांना एकत्र करून लढण्यासाठी आक्रमक पध्दत वापरेल. बिहारमधली पुढची निवडणूक नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर लढवली जाईल. 2015 मध्ये भाजपला यशाची चव चाखता आली नाही, पण दशकभरानंतर 2025 च्या निवडणुकीत त्यांच्या या रणनीतीचा परिणाम होईल, अशी आशा आहे.

First published:

Tags: Bihar, Nitish kumar