मराठी बातम्या /बातम्या /देश /10 हजार कोटी रुपयांची संपत्ती, आसाराम बापूच्या आश्रमाचे साम्राज्य कोण सांभाळतंय?

10 हजार कोटी रुपयांची संपत्ती, आसाराम बापूच्या आश्रमाचे साम्राज्य कोण सांभाळतंय?

आसाराम बापूचे धार्मिक साम्राज्य 10,000 कोटी रुपयांहून अधिक आहे.

आसाराम बापूचे धार्मिक साम्राज्य 10,000 कोटी रुपयांहून अधिक आहे.

आसाराम बापूचे धार्मिक साम्राज्य 10,000 कोटी रुपयांहून अधिक आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 जानेवारी : स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू यांना गांधीनगर कोर्टाने मोठा दणका दिला आहे. आसाराम बापू हा 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला आहे. आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गांधीनगर कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे. मात्र, आसाराम बापूचे साम्राज्य किती मोठे आहे, याबाबत तुम्ही कल्पनाही केली नसेल.

400 हून अधिक आश्रम, 1500 हून अधिक सेवा समित्या, 17000 हून अधिक बालसंस्कार केंद्रे, 40 हून अधिक गुरुकुल - तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूंचे धार्मिक साम्राज्य 10,000 कोटी रुपयांहून अधिक आहे. एक ट्रस्ट या मालमत्तेची देखरेख करतो आणि त्यांच्या क्रियाकलापांचे व्यवस्थापन करतो. पण मग या ट्रस्टचे नेतृत्व कोण करत आहे? आसाराम बापूंच्या देशभर पसरलेल्या आश्रमांचे प्रमुख म्हणून आता कोण काम करत आहे?

आसाराम किंवा तुरुंगात असलेला त्यांचा मुलगा नारायण साई हे काम करत नाहीत. ही जबाबदारी आता आसाराम बापूंची कन्या भारतश्री पार पाडत आहे. संत श्री आसारामजी ट्रस्ट ही सेवाभावी संस्था असून तिचे मुख्यालय अहमदाबाद येथे आहे. भारती आता या ट्रस्टच्या मुख्यालयातून दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करते. भारतीश्रीसोबत राहणार्‍यांचे म्हणणे आहे की, त्या फक्त खूप प्रवास करत नाही, तर देशातील 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या आश्रमांचे दैनंदिन कामकाज आणि आर्थिक व्यवहारही नियंत्रित करतात. मात्र, आसाराम बापूंप्रमाणे त्या वेगवेगळ्या शहरात जाऊन प्रवचनसारखा कोणताही कार्यक्रम करत नाहीत. आश्रमाव्यतिरिक्त त्या प्रसिद्धी माध्यमांपासूनही दूर राहतात.

08 वर्षांपासून आश्रम सांभाळत आहेत -

आसारामने अहमदाबादमध्ये पहिला आश्रम स्थापन केला. भारती यांचा जन्म 1975 मध्ये झाला. 2013 मध्ये आसारामला अटक झाली तेव्हा भारती आणि आसारामची पत्नी लक्ष्मी देवी यांनाही अटक करण्यात आली होती. पण नंतर त्यांची सुटका करण्यात आली. मागील 8 वर्षांत भारतीची पकड खूप मजबूत झाली आहे, असे सांगितले जाते. कारण आता हे जवळपास स्पष्ट झाले आहे की, एका वर्षात ना आसारामचे तुरुंगातून बाहेर येणे सोपे आहे आणि ना त्यांचा मुलगा नारायण साईचे. या दोघांशिवायही आसारामचे धार्मिक साम्राज्य सामान्यपणे सुरू आहे. भक्तांची संख्या आणि देणगी कमी झाली असली, तरी आसारामच्या भक्तांचे मत आहे की, त्याला जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे.

आसाराम बापूंच्या आश्रमाच्या अधिकृत वेबसाइटवर गेल्या काही वर्षांपासून आसाराम बापूंना न्याय मिळवून देण्याची मोहीम सातत्याने सुरू आहे, यामध्ये त्यांना कसे याप्रकरणात गोवण्यात आले, हे सांगितले जात आहे. भारतश्री सतत कार्यरत असतात. त्या सर्व आश्रमांना भेट देते. वर्षभरातच त्यांनी आसारामच्या धार्मिक साम्राज्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या संत श्री आसारामजी ट्रस्टच्या कामावरही देखरेख करण्यास सुरुवात केली आहे.

भाग्यश्री महागड्या कार वापरते. अहमदाबादमधील बाबा आसाराम यांच्या आश्रमाच्या आवारात प्रवचन आणि आरतीला उपस्थित राहते. त्यांच्याभोवती भक्तांची गर्दी असते. 48 वर्षीय भारती नाटकीय पद्धतीने प्रवचन देतात. नाचते, गाते. तिचे वडील जसे करायचे तसे ती स्वतःला फुलांनी सजवते. आश्रमातील आरती संबंधित उपक्रम दररोज YouTube वर अपलोड केले जातात.

गर्दीला मंत्रमुग्ध करण्याची भारतीची स्वतःची शैली -

गर्दी जमवण्यात निष्णात संत जे काही करतात ते भारतश्री करते. ती हात वर करून गर्दीला आनंद देण्याचा प्रयत्न करते. ती स्वतः प्रवचनाच्या आधी संगीतामध्ये गाते. मग ती परिपक्वतेने प्रचार करते. प्रवचन देताना, ती एक अनुभवी प्रचारक असल्याचे दिसते. आसारामच्या भक्तांच्या म्हणण्यानुसार, भारतीचे प्रवचन अतिशय मंत्रमुग्ध करणारे आहे.

हेही वाचा - आताची सर्वात मोठी बातमी! आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा

भारतीश्रीवर आरोप -

आसारामच्या सांगण्यावरुन, जो आश्रमातील मुलींना त्याच्याकडे पाठवत असे ती व्यक्ती भारती हीच होती, असा आरोपही तिच्यावर लावण्यात आला आहे. अमृत ​​प्रजापती या माजी साधकाने आसाराम भारतीला फोन करायचे असा आरोप केला होता. ती मुलींना गाडीतून आणायची. मात्र, भारती यांनी नेहमीच हे आरोप फेटाळून लावले.

आसाराम बापूंनी 70 च्या दशकात आध्यात्मिक साम्राज्य निर्माण केले होते. त्यानंतर त्याचा मुलगा नारायण साई आसारामच्या भक्तीचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी आला. ते पुरेसे नव्हते. लवकरच भारतीही त्यात सामील झाली. 15 डिसेंबर 1975 रोजी जन्मलेल्या भारतीने वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी दीक्षा घेतली. त्यानंतर 14 वर्षे ध्यान आणि योगासने केली. तिने एम.कॉम पर्यंत शिक्षण घेतल्याचे सांगितले जाते.

भारतीचा विवाह 1997 मध्ये डॉ. हेमंत यांच्याशी झाला होता. पण हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. नंतर दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर भारती आपल्या वडिलांच्या साम्राज्यात महिला आश्रमांचे काम पाहू लागली. यासोबतच ती प्रवचनही देऊ लागली.

First published:

Tags: Religion, आसाराम बापू