वाराणसी, 13 एप्रिल: उत्तर प्रदेशमधील हायप्रोफाईल वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरुद्ध काँग्रेस पक्ष प्रियांका गांधी यांना मैदानात उतरवण्याचा विचार करत आहे. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी प्रियांका गांधी यांच्या उमेदवारीची घोषणा करून काँग्रेस धक्का देण्याचा विचार करत आहे.
गेल्या म्हणजेच 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना देखील त्यांच्या विजयी मतांचे अंतर पाहता काँग्रेस सक्रीय झाले आहे. ज्या प्रमाणे राहुल गांधी यांना भाजपने अमेठीमध्ये घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच प्रमाणे मोदींना वाराणसीमध्ये घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. अर्थात यासंदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही. वाराणसीतून प्रियांका गांधी यांच्या नावाची घोषणा करण्याआधी काँग्रेस समाजवादी पक्ष आणि बसपा यांच्याशी चर्चा करेल. या दोन्ही पक्षांकडून काँग्रेस पाठिंबा मागू शकते.
फेब्रुवारी महिन्यात जेव्हा काँग्रेसने प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात उतरवले होते तेव्हापासून वाराणसीमधील काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांनी येथून निवडणूक लढवावी अशी मागणी करत आहेत. काँग्रेसने प्रियांका गांधी यांना अद्याप उमेदवारी दिली नाही. आता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की PM मोदींनी घेरण्यासाठी काँग्रेस वाराणसी जागेतून त्यांना उमेदवारी देईल.
2014च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतून वाराणसीत गेलेल्या आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवालांचा मोदींनी १ लाखहून अधिक मतांनी पराभव केला होता. तेव्हा काँग्रेसचे उमेदवार अजय राय हे तिसऱ्या स्थानावर राहिले होते. मोदींनी टक्कर देण्यात केजरीवाल यशस्वी झाले होते. त्यामुळेच काँग्रेस यंदा प्रियांका गांधी यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना प्रश्न विचारले असता निवडणूक कोठून लढवायची याचा निर्णय स्वत: प्रियांकाच घेणार आहेत.
VIDEO: उदयनराजेंच्या डायलॉगबाजीवर आदित्य ठाकरे म्हणाले...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा