मुंबई, 17 ऑक्टोबर : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालं आहे. मात्र अद्यापही परतीचा पाऊस परतलेला नाही, तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला आहे.
सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी 21 ऑक्टोबरपर्यंत रिपरिप सुरू असणार आहे.
अरबी समुद्र, बंगालच्या खाडीतील हवामानात सतत बदल होत आहेत. याचा परिणाम म्हणून पाऊस आणखी काही दिवस बरसण्याची चिन्ह आहेत. त्यानुसार राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, गुजरात, कोकण, गोवा, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा येथे हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. गुजरात, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशात परतीचा पाऊस हजेरी लावू शकतो.
हे ही वाचा-प्रियकराने डेटिंगसाठी खर्च केले 50000 रुपये; आता वाद गेलाय थेट उच्च न्यायालयात
सर्वसाधारणपणे 5 ऑक्टोबरपूर्वी राज्याच्या पूर्वेकडून परतीच्या पावसाची सुरुवात होते. त्यानंतर 10 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील बहुतांश भाग, मध्य प्रदेशातील पुर्वेकडील भाग, छत्तीसगडमधील उत्तरेकडील भाग असा परतीच्या पावसाचा प्रवास असतो. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि महाराष्ट्रात परतीच्या पाऊस 1 आठवड्यांनी लांबण्याची शक्यता आहे. असे असले तरी नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा कहर सुरू आहे. यामुळे राज्य सरकारने अनेकांना सुरक्षिततेसाठी स्थलांतरित केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai rain