नवी दिल्ली, 10 एप्रिल : राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला मोठा झटका दिला. याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना राफेल प्रकरणी पुन्हा सुनावणी होईल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. शिवाय, याप्रकरणामध्ये पुराव्यांच्या कागदपत्रांवर घेतलेला आक्षेप सर्वोच्च न्यायालयानं फेटळून लावला आहे. त्यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेसनं भाजपला लक्ष्य करत 'अब होगा न्याय' असं म्हटलं आहे. तसेच, मोदी सरकारनं राफेल बाबतची माहिती सर्वोच्च न्यायालयापासून लपवून ठेवली. पण, न्यायालयाच्या निर्णयामुळे न्याय मिळेल असं काँग्रेस प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत काँग्रेसनं भाजपवर निशाणा साधला. यापूर्वी देखील काँग्रेसनं राफेल प्रकरणावरून भाजपला लक्ष्य केलं होतं. शिवाय, राहुल गांधी यांनी देखील 'चौकीदार चोर है' म्हणत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं होतं.
Supreme Court allows admissibility of three documents in Rafale deal as evidence in re-examining the review petitions filed against the SC's December 14 judgement refusing to order probe in procuring 36 Rafale fighter jets from France. https://t.co/zqqdrTx8YS
राफेल खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. यासंदर्भात यशवंत सिन्हा, अरूण शौरी आणि वकिल प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी राफेल खरेदीसंदर्भातील दस्तावेज चोरी झाल्याची माहिती सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिली होती. फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडून 36 राफेल विमानांची खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान, ही खरेदी अधिक दरानं झाल्याचं सांगत त्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. लोकसभा निवडणुकीमध्ये देखील सध्या हा मुद्दा गाजतोय. पण, आता न्यायालयानं दिलेल्या या निर्णयामुळे विरोधकांना बळ मिळालं आहे.
VIDEO: माओवादी हल्ल्यातील शहिदांना दंतेवाडा पोलीस मैदानात सलामी