नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर: विजयादशमी अर्थात दसऱ्यानिमित्त पंजाबमध्ये (Punjab) रावण दहनाच्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. या प्रकारामुळे देशातील राजकारण तापलं आहे. या प्रकारामागे काँग्रेसचा कट असल्याचा आरोप भाजपनं केला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी या प्रकारावरून राहुल गांधी यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. नड्डा म्हणाले , पंजाबमध्ये जे काही केलं जात आहे ते राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावरूनच होत आहे. हा प्रकार अत्यंत लज्जास्पद असल्याचं नड्डा यांनी म्हटलं आहे.
The Rahul Gandhi-directed drama of burning PM’s effigy in Punjab is shameful but not unexpected. After all, the Nehru-Gandhi dynasty has NEVER respected the office of the PM. This was seen in the institutional weakening of the PM’s authority during the UPA years of 2004-2014.
या घटनेची माहिती मिळताच भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सांगितलं की, पंजाबमध्ये पीएम मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात येतो, ही लज्जास्पद घटना आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या इशाऱ्यावरूनच काँग्रेसनचं ड्रामा केला आहे.
जेपी नड्डा यांनी म्हटलं की, नेहरू आणि गांधी घराण्यानं कधीही देशाच्या पंतप्रधान पदाचा आदर केला नाही. 2004-2014 दरम्यान यूपीएच्या कार्यकाळात पंतप्रधानपद संस्थात्मक पद्धतीने कमकुवत करण्यात आलं होतं.
दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यात भाषण करताना चीनशी संबंधित जे मत मांडलं त्यावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आक्षेप घेतला आहे.
Combination of despondency and shamelessness is dangerous. Congress possesses both. Empty rhetoric of decency and democracy by the Mother is ‘complemented’ by live demonstrations of politics of hate, anger, lies and aggression by the Son. Double standards galore!