नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणानंतर देशाने आत्मनिर्भरतेच्या (Aatmanir Bharat) दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. एनसीसी कॅडेट्सच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी अॅप लॉन्च केल्यानंतर देशात स्वदेशी हत्यारांचे (Indigenous weapons) उत्पादन करण्याची शक्यता आहे. एका वेब सेमिनारमध्ये संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी सांगितले की, आम्ही चांगल्या पद्धतीने जगभरात योगदान देण्यासाठी आत्मनिर्भर होऊ इच्छितो...या मार्गाने जात असताना 101 संरक्षण वस्तू आयात करण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहे.
राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, मला विश्वास आहे की आपल्या मदतकर्ते आणि सहकाऱ्यांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून आपण केवळ मेक इन इंडियाचं नव्हे तर मेक फॉर वर्ल्ड मिळवू शकतो. या सेमिनारमध्ये संबोधित करताना चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी सांगितले की, आपल्याकडे उच्च क्षमता असलेल्या स्वदेशी हत्यारांचं उत्पादन करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती आहे.
We've capability, capacity & will to produce high-end indigenous weapon systems. With govt's push in right direction & vision of Aatnirbhar Bharat being promulgated, this is time to see this opportunity to achieve self-efficiency & becoming net exporter of defence equipment: CDS https://t.co/wwS07kFfpo
— ANI (@ANI) August 27, 2020
India today is facing numerous challenges and threats. Our collective response to COVID-19 has firmly established our ability to overcome any such unforeseeable eventuality: Chief of Defence Staff General Bipin Rawat at a webinar pic.twitter.com/L3KbVfIoxk
— ANI (@ANI) August 27, 2020
जनरल बिपिन रावत पुढे म्हणाले की, सशस्त्र सैन्य ही आत्मनिर्भर भारतासाठी चांगला संकल्प आहे. स्वत:च्या देशात तयार केलेल्या प्रक्रियेतून तयार केलेल्या हत्यारांतून युद्धात लढाई करीत जिंकण्यात जास्त सुख आहे, जो इतर वेळी मिळणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rajnath singh