दरम्यान, महाराष्ट्रात ठाकरे सरकारने दुसरा लॉकडाऊन लागू केला त्याला दोन आठवडे उलटून गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार असं जाहीर केलं होतं. त्यानंतर नरेंद्र मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करत 3 मेपर्यंत ताळेबंदी वाढवली. आता काही राज्यांनी आपापल्या क्षेत्रांत टाळेबंदी वाढवण्यासंदर्भात सुरुवात केली आहे. पंजाबने सर्वप्रथम आणखी 15 दिवस टाळेबंदी वाढणार असल्याची घोषणा केली आता Coronavirus चे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे लक्ष आहे. दोनच दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टाळेबंदी वाढवण्यासंदर्भाच्या निर्णयाचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय घोषणा करतात याकडे लक्ष आहे. राज्यात कालपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांची संख्या 9318 झाली आहे. ही देशातली सर्वात मोठी संख्या आहे. आज राज्याची संख्या 10 हजाराचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यात या विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. त्यामुळे या दोन शहरांमधला आणि जिल्ह्यांमधला लॉकडाऊन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.GoI issues order to State/UTs to facilitate Inter-State mvmt of stranded people inc. #MigrantLabourers, in the country. All persons to be medically screened at source & destination; & kept in home/institutional quarantine on arrival, as per @MoHFW_INDIA guidelines.#COVID19 pic.twitter.com/4zfztwB2NA
— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) April 29, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus