भटिंडा (पंजाब)14 मे : लोकसभेच्या निवडणुकीचा आता फक्त शेवटचा टप्पा राहिलाय. मतदानाला अवघे काही दिवस राहिले असताना सर्वच नेत्यांनी प्रचारात आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी पंजाबमधल्या प्रचारसभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी पंजाब प्रखर आंदोलन करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हे ब्रिटिशांची चमचेगीरी करत होते असा आरोप त्यांनी केला.
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान काय असा प्रश्न काँग्रेसकडून कायम विचारला जातो. तर संघाच्या लोकांनी स्वातंत्र चळवळीत सहभाग घेतला होता असं उत्तर संघ परिवाराकडून कायम दिलं जातं. याही निवडणुकीत तो मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला.
Priyanka Gandhi Vadra in Bathinda, Punjab: When the entire Punjab was fighting for country's independence, RSS people were doing 'chamchagiri' (flattery) of Britishers, they never fought in the independence movement. pic.twitter.com/ObeOD0R549
प्रियंका गांधी म्हणाल्या, पंजाबचे लोक स्वातंत्र्य लढ्यात अग्रभागी होते. स्वातंत्र चळवळीत काँग्रेसच्या लोकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. महात्मा गांधीजींच्या मागे सर्व देश उभा राहिला. त्यावेळी संघाचे लोक मात्र ब्रिटिशांची चमचेगीरी करत होते असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. या आधी राहुल गांधी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरही टीका केली होती. स्वातंत्र्यवीरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती असा आरोपही त्यांनी केला होता.
काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी 1984च्या दंगलीवर प्रतिक्रिया देताना जे झालं ते झालं, त्याचं आता काय? असं वक्तव्य केलं होतं. त्यावर देशभर वादळ निर्माण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल केल्याने पित्रोदांना माफीही मागावी लागली होती. त्याला छेद देण्यासाठी आता काँग्रेसकडून स्वातंत्र्य चळवळीतल्या संघाच्या योगदानाचा मुद्दा उपस्थित करण्यात येत असल्याचं मतही व्यक्त होतंय.