नवी दिल्ली 16 मे : लोकसभा निवडणुकीतील भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेबाबात जे वक्तव्य दिलं होतं त्यावर त्यांनी सार्वजनिक माफी मागावी अशी भूमिका भाजपने घेतली आहे. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, असंही भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. त्यांच्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही असंही ते म्हणाले.
'नथुराम हा देशभक्त होता, आहे आणि राहिल', असं वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभर वादळ निर्माण झालं. काँग्रेस आणि सर्वच विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे तातडीने पत्रकार परिषद घेत भाजपने हात झटकले आणि साध्वीला कडक समज देण्यात येत असल्याचं सांगत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
GVL Narasimha Rao, BJP on Pragya Singh Thakur's statement "Nathuram Godse was, is & will remain a 'deshbhakt": BJP does not agree with this statement, we condemn it. Party will ask her for clarification, she should apologise publicly for this statement. pic.twitter.com/yBEs8nQoWW
यापूर्वी कमल हसन यांच्या वक्तव्यावरूनही राजकारण पेटलं होतं. 'नथुराम हा स्वातंत्र्यानंतरचा पहिला हिंदू दहशतवादी होता', असं हसन यांनी म्हटल्याने वाद निर्माण झाला होता.
काय म्हणाल्या होत्या साध्वी?
'नथुराम गोडसे देशभक्त होते आणि आहेत. त्यांना दहशतवादी बोलण्याआधी स्वत:कडे पाहावं' भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केली. अभिनेते कमल हसन यांनी काही दिवसांपूर्वी नथुराम गोडसे दहशतवादी असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याआधी साध्वा प्रज्ञासिंह यांनी हेमंत करकरेंवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आता नथुराम गोडसेंबाबत केलेल्या वक्तव्यानं पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत.