नवी दिल्ली 23 एप्रिल : लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले. प्रचाराचा झंझावत कायम आहे. अनेक सर्व्हे येत आहेत आणि लोकांना उत्सुकता आहे 23 मेला काय होणार. फिर एक बार मोदी सरकार येणार की महाआघाडीचं सरकार येणार याची चर्चा सुरू झालीय. देशात 2014सारखी लाट नसली तरी देशात परिवर्तन व्हाव असंही लोकांना वाटत नाही असं मत CSDS चे संचालक संजय कुमार यांनी व्यक्त केलं. 'न्यूज18 इंडिया'च्या 'आर पार' या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.
देशातले आघाडीचे सेफॉलॉजीस्ट असलेले संजय कुमार म्हणाले, आत्तापर्यंतच्या तीन टप्प्यातलं मतदानाचं प्रमाण पाहिलं तर हे दिसून येतं की 2014सारखी नरेंद्र मोदी यांची लाट नाही हे खरं आहे. त्याचबरोबर देशात परिवर्तन व्हावं असंही लोकांना वाटतं नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
#AarPaar | तीन चरण के बाद किसका दावा दमदार?
— News18 India (@News18India) April 23, 2019
देखिए ये वीडियो.@AMISHDEVGAN pic.twitter.com/MLmL75CHz9
संजय कुमार म्हणाले, मतदानाची टक्केवारी ही फार काही जास्त नाही किंवा कमीही नाही. त्यामुळे भाजपला फार काही धक्का बसेल असं वाटत नाही. काँग्रेसला सत्ता मिळवायची असेल तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मतं मिळवावी लागतील आणि ते सध्या तरी शक्य दिसत नाही असंही ते म्हणाले.
काँग्रेसने 'राफेल'च्या भ्रष्टाचाराचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला होता. 'चौकिदार चोर है' ही त्यांची घोषणाही खूप गाजली पण त्यांचा फार फायदा होईल असं दिसत नाही. भारताच्या हवाई हल्ल्यानंतर प्रचाराची पूर्ण दिशाच बदलून गेली. बेरोजगारी, शेतकरी, रोजगार हे मुद्दे बाजूला पडून भारत-पाकिस्तान, हिंदू-मुस्लिम, देशभक्ती-देशद्रोही असे मुद्दे आले असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
#AarPaar | BJP के खिलाफ बहुत बड़ा आक्रोश नहीं दिखाई पड़ता है : संजय कुमार, राजनीतिक विश्लेषक
— News18 India (@News18India) April 23, 2019
देखिए ये वीडियो.@AMISHDEVGAN pic.twitter.com/T38GN2G2nd
पश्चिम बंगालमध्ये काय होणार?
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसलीय. त्यामुळे यावेळी सर्व देशाचं लक्ष पश्चिम बंगालकडे लागलं आहे. आत्तापर्यंत स्पर्धेत नसलेल्या भाजपने गेल्या काही वर्षात पश्चिम बंगालमध्ये चांगलेच हात पाय पसरले आहेत. लोकांनी आम्हाला परिवर्तन पाहिजे असं म्हटलंय तर तृणमूलची पाळमुळं उखडून टाकलं हे भाजपला पाहिजे तेवढं सोपं नाही हे दिसून आलं 'न्यूज18 इंडिया'च्या 'भैयाजी कहिन' या निवडणूक यात्रेमधून.
#AarPaar | जनता ही जनार्दन है : @ssrajputinc @AMISHDEVGAN pic.twitter.com/mc9AjFUmAb
— News18 India (@News18India) April 23, 2019
कम्युनिष्टांचा 35 वर्षांचा गड उध्वस्त करत ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवली. गेल्या 10 वर्षांपासून त्यांची राज्यात सत्ता आहे. लोकसभेतही तृणूलचे सर्वाधिक खासदार आहेत. मात्र गेल्या काही वर्षात भाजपने तिथे हातपाय पसरायला सुरूवात केलीय. तृणमूलचे अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये गेल्याने पक्षाला धक्का बसलाय. भाजपकडे उमेदवारी द्यायलाही माणसं नाहीत अशी टीका तृणमूलचे ज्येष्ठ नेते दिनेश त्रिवेदी यांनी केलीय.
#AarPaar | इनके साथी उमर अब्दुल्ला कहते हैं कि देश में दो प्रधानमंत्री होंगे : @gauravbh @AMISHDEVGAN pic.twitter.com/HwWEFhcQ7F
— News18 India (@News18India) April 23, 2019
भाजपचा प्रचार
उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या सर्वात जास्त म्हणजे 42 जागा आहेत. तृणमूल अल्पसंख्याकांचा तुष्टीकरण करतं हा मुद्दा घेऊन भाजपने जोरदार प्रचार केलाय. त्याचा फायदा होईल असं भाजपला वाटतं. तरुण आणि जे नवीन मतदार आहेत ते आपल्या बाजूने वळतील असं भाजपला वाटतं. तर यावेळी तरुणांनाही भाजपचं आकर्षण वाटतं आहे.
2014 च्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 73 जागा उत्तर प्रदेशात मिळाल्या होत्या. यावेळी एवढ्या जागा मिळणं त्यांना शक्य नाही त्यामुळे पश्चिम बंगालमधून त्या जागांची काही भरपाई होऊ शकते असं भाजपला वाटतं आहे.