अलवर, 30 जानेवारी : भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना एका 19 वर्षीय जवानाला वीरमरण आलं आहे. पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं. त्यावेळी झालेल्या चकमकीत 19 वर्षीय निखिल दायमा शहीद झाले.
Salute the martyrdom of Alwar, #Rajasthan’s braveheart Sh. Nikhil Dayma who made the supreme sacrifice in an encounter with terrorists in Jammu & Kashmir. My heartfelt condolences to his family members & prayers that they find strength. We stand with them in this difficult time.
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) January 30, 2021
निखिल यांचं पार्थिव आज जम्मू-काश्मीरहून दिल्लीला रवाना होणार असून त्यानंतर त्यांच्या मूळ गावी सैदपूर येथे नेण्यात येणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विटरवर निखिल यांना श्रद्धांजली वाहली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांशी चकमकीदरम्यान निखिल यांना गोळी लागली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. परंतु त्यांना वीरमरण आलं. दोन दिवसांपूर्वी ते बेस कँपहून उरी येथे गेले होते. 19 वर्षीय निखिल यांची उरी येथे पहिली पोस्टिंग होती. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जानेवारीला सुट्टीवरून परत येऊन ते पुन्हा ड्युटीवर दाखल झाले होते. त्यानंतर आलेल्या या बातमीने कुटुंबियांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.