नवी दिल्ली 03 नोव्हेंबर:: चीन बरोबर तणाव असताना (Border Dispute With China) भारतीय हवाई दलाची (Indian Air force) क्षमता आणखी वाढणार आहे. अत्याधुनिक राफेल विमानांचा (Rafale Fighter Jet) तिसरा ताफा बुधवारी (4 नोव्हेंबर) हवाई दलात दाखल होणार आहे. यात 3 विमाने आहेत. ही विमाने आणण्यासाठी हवाईदलाची टीम फ्रान्समध्ये दाखल झाली होती. या आधी दोन टप्प्यांमध्ये विमाने आली होती.
या विमानांमुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंम्मत कुणाची होणार नाही. त्यांना दहा वेळा विचार करावा लागेल असं संरक्षण तज्ज्ञांचं मत आहे.
ही विमाने आणण्यासाठी हवाई दलाचं एक पथक फ्रान्सला गेलं होतं. सगळ्या तपासण्या आणि चाचण्या पूर्ण करून ही विमान भारतात आणली जात आहेत. ही विमाने आल्यानंतर भारतातल्या राफेल विमानांची संख्या ही 12 पर्यंत जाणार आहे. सध्या जगात ही विमाने अत्याधुनिक समजली जातात.
या नंतर आता 3 जानेवारी आणि मार्चमध्ये 3 आणि त्यानंतर एप्रिल महिन्यांत 7 विमाने भारतात येणार आहेत. त्यानंतर भारतात आलेल्या विमानांची संख्या ही 21 होणार आहे. चीनसोबत सुरू असलेला सीमा वाद आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर ही विमाने भारतात आल्याचा त्याचा लष्कराला मोठा फायदा होणार आहे.
'विदेशातून ऑपरेट झाली ठाकरे सरकारची बदनामी करणारे ती दीड लाख Twitter अकाउंट्स'
सप्टेंबर 2016 रोजीमध्ये फ्रान्सबरोबर झालेल्या करारात भारताने सुमारे 58 हजार कोटींमध्ये 36 राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी कऱण्यात आली. त्यापैकी 30 लढाऊ विमानं तर 6 प्रशिक्षण देणारी विमानं आहेत. राफेलची पहिल्या 5 विमानांची तुकडी बुधवारी भारताच्या ताफ्यात दाखल होत आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंत भारताला राफेलची 36 विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होतील.
हवेतूनच जमिनीवर 60 किलोमीटरपर्यंत अचूक निशाणा साधणार्या या विमानांमुळे भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात मोठी भर पडणार आहे.