नवी दिल्ली 03 डिसेंबर: सरकार विरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत काही वर्षांपूर्वी पुरस्कार परत करण्याची मोहिम सुरू झाली होती. आता केंद्राच्या शेतकरी धोरणाविरोधात आंदोलन सुरू आहे. त्याच्या समर्थनासाठी पुरस्कार परत करण्याची मोहिम सुरू झाली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल (Former Punjab CM Parkash Singh Badal ) यांनी पद्म विभूषण (Padma Vibhushan) पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. अकाली दलाचे नेते सुखदेव सिंह ढींढसा (Sukhdev Singh Dhindsa) यांनीही आपला पद्म भूषण (Padma Bhushan) पुरस्कार परत करण्याची घोषणा केलीय.
प्रकाश सिंह बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीन पानांचं पत्र लिहून आपला विरोध व्यक्त केलाय. ते म्हणाले, मी गरीब असल्यामुळे पुरस्कारापलिकडे परत करण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही. सरकारने शेतकऱ्यांसोबत विश्वासघात केला आहे. शेतकऱ्यांचा अपमान होत असताना मी शांत राहू शकत नाही. त्यामुळे मी हा पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी कळवलं आहे.
मी जो काही आहे तो शेतकऱ्यांमुळे आहे. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या कृषी विधेयकाविरोधात अकाली दलाच्या मंत्र्यांनी मोदी सरकारमधून राजिनामा देत NDAमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या आठ दिवसांपासून शेतकऱ्यांनी दिल्लीकडे येणारे काही महामार्गे रोखून धरले आहेत. तर दिल्लीत शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू असून त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
#WATCH | दिल्ली: केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर के साथ विज्ञान भवन में बैठक के लिए गए किसान ब्रेक के दौरान, सरकार द्वारा किए गए खाने के प्रबंध की जगह अपने लाए हुए खाने को बांटकर खाते हुए। #FarmersProtest pic.twitter.com/GGvDWpPvQm
— ANI_HindiNews (@AHindinews) December 3, 2020
राजधानी दिल्लीत सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू आहे. चर्चेत जेवणाचा ब्रेक झाल्यानंतर शेतकरी नेत्यांनी सरकारने दिलेली जेवण नाकारत लंगरमधून मागवलेलं जेवण घेणेच पसंत केले.