दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पुढे म्हणाले की, कोरोना साथीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षांचं आयोजन करण अत्यंत घातक ठरू शकतो. अशी चूक देशासाठी खूपच महागात पडू शकते. केंद्र सरकारनं प्राधान्यानं विद्यार्थ्यांचं लसीकरण करायला हवं. त्यासाठी लस उत्पादक कंपनी फायझरशी यासंदर्भात बोलायला हवं. देशभरातील सर्व 1.4 करोड 12 वीच्या विद्यार्थ्यांचं आणि जळपास तितक्याचं शिक्षकांचं लसीकरण करायला हवं. केंद्र सरकारनं जर लस उपलब्ध करुन दिली. तर राज्य सरकारे एका आठवड्याच्या कालावधीत 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना लस देऊ शकतील. त्या दृष्टीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे. हे वाचा-चिंताजनक..! कोरोना विषाणूचा दुसऱ्या लाटेत सर्वाधिक तरुणांचा मृत्यू त्याचबरोबर, दिल्लीत अवघ्या दोन दिवसांत बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांच लसीकरण करू शकतो, असा विश्वासही मनीष सिसोदिया यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, माझ्या मते बारावीत शिकणारे सुमारे 95% विद्यार्थी 17.5 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना 18 वर्षांपुढील नागरिकांना दिली जाणारी लस यांनाही दिली जाऊ शकते का? याबाबत केंद्र सरकारनं तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.केंद्र सरकार के साथ मीटिंग में आज माँग रखी कि परीक्षा से पहले 12वीं के सभी बच्चों के लिए वैक्सीन की व्यवस्था करें। बच्चों की सुरक्षा से खिलवाड़ कर परीक्षा का आयोजन करवाने की ज़िद बहुत बड़ी गलती और नासमझी साबित होगी। #पहले_वैक्सीन_सुरक्षा____फिर_परीक्षा
— Manish Sisodia (@msisodia) May 23, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Board Exam, Corona vaccine, Coronavirus, Student