याआधी राहुल गांधी यांनी शुक्रवारी गलवान खौऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीवरून भारत सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की हे आता स्पष्ट झाले आहे की: 1. गलवानमध्ये चिनी हल्ला पूर्व नियोजित होता. 2. भारत सरकार झोपेत होते आणि त्यांनी ही समस्या नाकारली होती. 3. आमच्या शहीद जवानांना याची किंमत मोजावी लागली.The Indian Army is a strong army and can defeat China. Rahul Gandhi don’t indulge in politics in this...my son fought in the army and will continue fighting in the army: Father of injured Indian soldier who fought in #GalwanValleyClash (Amateur Video Source) pic.twitter.com/uGOdM2dJkM
— ANI (@ANI) June 20, 2020
15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय सैन्य यांच्यात चकमक झाली. यात 40 हून अधिक चीनी सैनिक जखमी झाले किंवा ठार झाले, याबाबत चीननं काहीही माहिती दिलेली नाही आहे. नुकताच चीननं गलवान खोरं आमचा भाग असल्याचा दावा केला. भारतीय सैन्यानं सीमारेषा ओलांडल्याचा आरोपही चीननं भारतीय सैन्यदलावर केला आहे. तर भारतीय सैन्य आपल्या सीमा रेषेचं संरक्षण कोणत्याही परिस्थित करेल आणि येणाऱ्या स्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचा इशाराही आर. के. एस भदौरिया यांनी दिला आहे. संपादन-प्रियांका गावडे.It’s now crystal clear that:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 19, 2020
1. The Chinese attack in Galwan was pre-planned.
2. GOI was fast asleep and denied the problem.
3. The price was paid by our martyred Jawans.https://t.co/ZZdk19DHcG
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.