गुवाहाटी, 25 मे : मणिपूरमध्ये झालेल्या भूकंपामुळे या राज्यासह संपूर्ण ईशान्य भारत हादरला. रिश्टर स्केलवर 5.5 तीव्रता दाखवणाऱ्या या भूकंपाने मोठं नुकसान झाल्याचं वृत्त नाही. पण या भूकंपाचे हादरे आसामच्या गुवाहाटीपासून अनेक मोठ्या शहरांत जाणवले. मोइरंग या मणिपूरमधल्या छोट्या शहराच्या पश्चिमेला 15 किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सेसमॉलॉजीने (NCS) दिली.
An earthquake with a magnitude of 5.5 on the Richter Scale hit 15 km West of Moirang in Manipur at 20:12 hours today: National Center for Seismology (NCS)