कोरोनाला फक्त भारतच हरवू शकतो', WHOने केलं कौतुक कोरोनाला हरवणं हे आपल्या हातात आहे आणि भारतच कोरोनाला हरवू शकतो असा विश्वास WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कार्यकारी संचालक मायकल जे रेयान यांनी व्यक्त केला आहे. भारतात करोनाग्रस्तांची संख्या 499 वर पोहचली आहे. करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून भारतानं देशभरातल्या 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित केलं आहे. भारताने कोरोनाचा फैलाव लक्षात घेता अनेक कठोर पाऊलं उचलली पण ती योग्य असल्याचं रेयान म्हणाले आहेत. कोरोनाला थांबवण्यासाठी असेच कठोर नियम लागू करा असंही WHO ने भारताला सुचवलं आहे. त्यामुळे देशात कोरोनाला थांबवण्यासाठी सरकार योग्य ती पाऊलं उचलत आहे. पण त्याला प्रत्येक नागरिकांने पाठिंबा देत नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. कोरोनावर आपणच मात करू शकतो. कोरोनाला पळून लावणं हे प्रत्येक नागरिकाच्या हातात आहे. त्यामुळे नियम पाळा आणि घरीच सुरक्षित राहावैश्विक महामारी कोरोना वायरस के बढ़ते प्रकोप के संबंध में कुछ महत्वपूर्ण बातें देशवासियों के साथ साझा करूंगा। आज, 24 मार्च रात 8 बजे देश को संबोधित करूंगा।
— Narendra Modi (@narendramodi) March 24, 2020
Will address the nation at 8 PM today, 24th March 2020, on vital aspects relating to the menace of COVID-19.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rajyasabha election